लाल दहशतवाद

छत्तीसगढमधील २५ मेच्या हल्ल्यानं केवळ सरकारच नाही तर सर्वसामान्यही हादरुन गेलाय. हजार पेक्षा जास्त नक्षलवादीनी परिवर्तन यात्रेला टार्गेट केलं. आदिवासीना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच जण सरसावले असताना नक्षलवाद्यांना मात्र हे नकोय का हाच प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 27, 2013, 11:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
छत्तीसगढमधील २५ मेच्या हल्ल्यानं केवळ सरकारच नाही तर सर्वसामान्यही हादरुन गेलाय. हजार पेक्षा जास्त नक्षलवादीनी परिवर्तन यात्रेला टार्गेट केलं. आदिवासीना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच जण सरसावले असताना नक्षलवाद्यांना मात्र हे नकोय का हाच प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय..
घनदाट जंगलातला तो घाटवळणाचा रस्ता निरपराध लोकांच्या रक्तानी पुरता माखला होता. नक्षलवाद्यांचे ते हिस्त्र कृत्य पाहून सगळा देश हादरुन गेला. आतंकवाद्यांच्या या लाल ब्रिगेडमध्ये सुमारे १००० नक्षलवादी सामील झाले होते. छत्तीसगढमधील सुकुमाच्या जंगलात दबा धरुन बसलेले नक्षलवादी निरपरांना ठार मारायचच यासाठी लपून बसले होते. पण कसा झाला हा देशातला सगळ्य़ात मोठा नक्षलवादी हल्ला.. एवढा मोठा नरसंहार करण्यासाठी कसा आणि कोणी रचली ही खतरनाक योजना..
२५ मेला कॉंग्रेसची परिवर्तन यात्रा जेव्हा या जंगलमार्गातून जायला सुरुवात झाली तेव्हा झाडाआड लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी रॅलीतल्या निरपरांधावर हल्ला चढवला. रॅलीच्या वाटेत झाड तोडून नक्षलवाद्यांनी मार्ग रोखला. त्यानंतर रॅलीमध्ये सुरुवातीला उभ्या असलेल्या दोन गाड्या उडवून देण्यात आल्या. काही तरी अघटीत घडतय हे सुरक्षारक्षकांना कळण्याच्या आत चहुबाजूनी सुरु झाला अंदाधुंद गोळीबार
अचानकपणे झालेल्या या हल्ल्यानंतर त्याठिकाणी हलकल्लोळ माजला होता. चहूबाजुने हल्ला होत होता. लोक जीव वाचवण्यासाठी याचना करत होते. पण नक्षलवाद्यांनी फक्त रक्ताचा सडा पाडला होता. नक्षलवाद्यांना कुणालाच जिवंत सोडायचं नव्हतं की कुणाचं काही एकायचं नव्हत. जेव्हा सुरक्षारक्षकांनी फायरिंग थांबवली तेव्हा नक्षलवाद्यांनी रॅलीतील वाहनांधून प्रत्येकाला बाहेर काढून त्यांना गोळ्या झाडल्या.
नक्षलवाद्यांच्या आतकाची ही काही पहिलीची कहाणी नाही आहे. गेल्या वर्षीही या नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या ७६ जवानांना मृत्यूमुखी पाडलं होतं. काय आहे हे नक्क्षल आंदोलन .. नक्षलवाद्यांबद्दल कुणालाही कसलीही सहानुभूती वाटत असो.. पण यांचा खरा चेहरा रक्तानं माखलेलाच आहे. नक्षलवाद्यांच्या समस्या काहीही आणि कितीही वास्तववादी असल्या तरी नरसंहाराला क्षमा का करायची.. कारण सामाजिक हक्काची भाषा करणा-यांचा हाच आहे खरा नक्षलवादाचा रक्तरंजीत चेहरा.
छत्तीसगड मध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर नक्षलवादी चळवळीचं वास्तव आता सा-यासमोर आलीय.. या घडीला जरी केवळ क्रांतीचा मुखवटा असला तरी आतला चेहरा अतिशय भेदक असाच आहे. नेमकी सुरुवात कशी झाली, आणि कशी भरकटत गेली नक्षलवादी चळवळ.. एक नजर..
भारतातल्या नक्षलवादाला सुरुवात ही अशी झाली..
1967, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्कसिस्टचे नेते कानू सन्याल आणि सीलीगुडी किसान सभेचे अध्यक्ष जंगल संथाल यांनी पश्चिम बंगालच्या नक्षलवाडी गांवात एका हिंसक आंदोलनाची सुरुवात केली.. आणि इथूनच नक्षलवादाचा जन्म झाला...
18 मे 1967
कानू सन्याल यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांना शस्त्रांच्या जोरावर त्यांच्या जमीनी परत मिळवण्याचा ठराव पास करण्यात आला. सुरुवातीला नक्षल आंदोलानाचा हेतू आणि उद्देश इतकाच होता.
जमीनदारांच्या लोकांनी जमीनीच्या वादातून नक्षलवाडी या गावावर हल्ला केला. 24 मेच्या दिवशी पोलीसांची एक टीम नक्षलवाडी येथे पोहोचली...जंगल सन्याल तयार होता...धनुष्याबाणाने हल्ला करुन एका पोलीस इंस्टपेक्टरची हत्या करण्यात आली आणि इथूनच सुरुवात झाली ती त्या लोकांनी या आंदोलनात सामिल होण्याची ज्यांच्या कडे स्वत:ची जमीन नव्हती. संथाल जनजातीच्या गरीब जनतेला जमीनदारांच्या तावडीतून आपली जमीन परत मिळवण्याचा एक मार्ग मिळाला...
1970च्या दशकात नक्षल आंदोलनाचे दोन भाग पडले. 1980च्या दशकात नक्षल आंदोलनाचे तब्बल 30 भाग पडले. 1970 च्या दशकात नक्षल आंदोलन हे कोलकाताच्या विद्यार्थांच शस्त्र बनलं होतं. विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळा-कॉलेज सोडून नक्षल आंदोलनात सहभागी होऊ लागले.
पण या नक्षल आंदोलनाचं स्वरुप बदलू लागलं, नक्षल आंदोलनाचा वापर करुन वै-यांना टार्गेट केलं जाऊ लागलं. जमीनदारांबरोबरच व्यापारी, यूनिलर्सिटीचे शिक्षक, पोलीस अधिकारी आणि राजनेत्यांना निशाणा बनवलं जाऊ लागलं. कोलकात्यात नक्सलवाद्यांचा आतंक वाढला..शाळा-कॉलेजांना टाळे लागले. नक्षलवाद्यांनी जाधवपूर युनिवर्सिटीमध्येच शस्त्र बनवण्याचं काम सुरु केलं. कोलकात्याचं प्रेसीडेंसी कॉलेज नक्षलवाद्यांचं हेडक्वार्टर बनलं. नक्षलवादाशी सुशिक्षित लोकांही मोठ्याप्रमाणात जोडली गेली.