ऑडिट मतदारसंघाचं : अहमदनगर

ऑडिट मतदारसंघाचं – अहमदनगर

Updated: Apr 9, 2014, 07:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा असलेल्या मतदारसंघात आज आपण जाणार आहोत. राजकीय दृष्ट्या मातब्बर अशा नेत्यांच्या या जिल्ह्यात सर्वाधिक राजकीय घडामोडी घडत असतात.
अहमदनगर म्हटलं की नजरेसमोर येतो तो मोघलांचा काळ आणि निजामशाहीतील राज्य कारभाराचे प्रमुख केंद्र. 15 व्या शतकात बहामनी राज्याची शकले होऊन मलिक अहमदशहा बहिरी नगर जिल्ह्यातील सीना नदीच्या काठी विसावला... त्याच्याच नावावरून अहमदनगर हे नाव पडलं अशी आख्यायिका आहे.
रामायणकाळात अगस्ती ऋषी आणि रामाची भेट झाली ती याच परिसरात. `चले जाव` आंदोलनादरम्यान पंडित जवाहरलाल नेहरूंनी नगरमध्ये असलेल्या भुईकोट किल्ल्यातील तुरूंगात `डिस्कवरी ऑफ इंडिया` तर बाबासाहेब आंबेडकरांनी `थॉटस ऑन पाकिस्तान` लिहिलं. या जिल्ह्यातील प्रमुख पीक ज्वारी असून ते दोन्ही हंगामात घेतलं जातं. ऊस हेदेखील महत्त्वाचं पीक असून जिल्ह्यातील सर्वाधिक साखर कारखाने नगरमध्येच आहेत.
 
राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना आणि सहकारी पतसंस्था याच जिल्ह्यात स्थापन झाली. सहकार महर्षी विठ्ठलराव विखे-पाटील यांनी धनंजयराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखील त्याची मुहूर्तमेढ रोवली. राजकीय महत्वाकांक्षा असलेल्यांचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ख्याती आहे. परराज्याची सीमा नसलेला हा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे.
दुसरे गांधी अशी ओळख असलेले अण्णा हजारेंचं राळेगणसिद्धी गावही याच मतदारसंघात मोडतं. राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजार या दोन गावांनी राज्यात ग्राम व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला. लष्करी सामर्थ्याचे आधुनिक आणि महत्वपूर्ण मोठे तळ नगरमध्ये आहेत.
तोफखाना दलाचे मोठे युनिट येथे असून सध्या भुईकोट किल्लाही त्यांच्या ताब्यात आहे. चारचाकी वाहन असो की दुचाकी कुठल्याही वाहनाचे उत्पादन करावयाचे असेल तर अहमदनगरच्या व्हेईकल रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लीशमेंट केंद्रातून परवानगी मिळवावी लागते.
सुरूवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात 1996साली काँग्रेसचे मारूती शेळके खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1998 साली झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेत गेलेल्या बाळासाहेब विखे पाटील यांनी बाजी मारली. 1999 साली भाजपचे दिलीपकुमार मनसुखलाल गांधी यांना खासदारकीची गादी मिळाली. 2004मध्ये राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख विजयी झाले होते. तर 2009 लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा भाजपच्या दिलीपकुमार गांधी यांनी बाजी मारली. 
2014 लोकसभा निवडणुकीसाठी इथल्या मतदारांच्या संख्येत जवळपास दीड लाखांनी वाढ झाली आहे.
याआधी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 15 लाख 17 हजार 951 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही 7 लाख 89 हजार 897 होती, तर महिला मतदारांची संख्या 7 लाख 28 हजार 054 एवढी होती.
पूर्वाश्रमीचा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघातील अनेक कम्युनिस्ट कालांतराने काँग्रेसवासी झाले. मात्र भारतीय जनता पक्षाने तेथे आपलं आव्हान कायम राखलंय. या मतदारसंघात दुरंगी लढत झाल्यास काँग्रेस आघाडीला यश मिळते आणि तिरंगी लढत झाल्यास भाजपचा उमेदवार निवडून येतो, असा गेल्या तीन निवडणुकांमधील अनुभव आहे.
अहमदनगर लोकसभेतील भाजपचे शिलेदार अर्थात विद्यमान खासदार दिलीपकुमार गांधी यांची ओळख
खासदार दिलीपकुमार गांधी
नाव - खा. दिलीप मनसुखलाल गांधी
जन्म - 9 जानेवारी 1951
वय -  62 वर्ष
शिक्षण -  एस. एस. सी.
 
भाजपच्या तालमीत घडलेले अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी गेल्या तीन दशकांपासून पक्षात विविध पदांवर कार्यरत आहेत. भाजपचा चेहरा असलेले दिलीप गांधी दोनवेळा या लोकसभेवर निवडून आले आहेत.
महानगरपालिकेत नगरसेवक, नंतर याच पालिकेत भाजपचे नेते आणि नंतर 1985 मध्ये ते नगरपालिकेत उपनगराध्यक्ष झाले. 
1999 साली खासदार म्हणून निवडून येताच जहाज बांधणी मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नगर जिल्ह्याला बाळासाहेब विखेंनंतर केंद्रीय मंत्रीपद मिळाले ते दिलीप गांधीच्या रूपाने. केंद्रात 2009 सालपासून पेट्रोल आणि नैसर्गिक वायू, नागरी वाहतूक आणि घरे यांसारख्या समित्यांच्या सदस्यपदी ते विराजमान आहेत. अहमदनगर अर्बन बँकेचं संचालकपदही सध्या ते सांभाळत आहेत.
 
गांधींचा जन्म पुण्यातील असला तरी सध्या ते नगर शहरात वास्तव्यास आहेत. आपल्या घरातील कार्यालयातूनच ते आपला दैनंदिन कारभार चाल