भरगच्च भरलेल्या वऱ्हाडाच्या बसवर कोसळली विजेची तार

राजस्थानच्या टोंक भागात चालत्या बसवर अचानक कोसळलेल्या विजेच्या तारेमुळे ३० जणांचा होरपळून मृत्यू झालाय. 

Updated: Jun 12, 2015, 06:00 PM IST
भरगच्च भरलेल्या वऱ्हाडाच्या बसवर कोसळली विजेची तार title=

जयपूर : राजस्थानच्या टोंक भागात चालत्या बसवर अचानक कोसळलेल्या विजेच्या तारेमुळे ३० जणांचा होरपळून मृत्यू झालाय. 

एका लग्नाला जाण्यासाठी वऱ्हाडी या बसमध्ये बसले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वऱ्हाडींनी गच्च भरलेली ही बस टोंकच्या सांच गावापाशी पोहचली होती. तेव्हा अचानक हाय वोल्टेज इलेक्ट्रिक तार तुटून बसवर कोसळली. 

अचानक घडलेल्या या दुर्घटनेत बसमध्ये बसलेल्या लोकांना काही कळायच्या आतच सगळ्याच लोकांना विजेचा जोरदार करंट बसला... आणि अनेकांचा जागीच मृत्यू झाला. 

बसमधून आत्तापर्यंत ३० मृतदेहांना बाहेर काढण्यात आलंय. अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.