अक्षयच्या आयडियाला मोदी सरकारचा पाठिंबा, शहिदांना मिळणार मदत

शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत के वीर नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात आलं.

Updated: Apr 9, 2017, 10:20 PM IST
अक्षयच्या आयडियाला मोदी सरकारचा पाठिंबा, शहिदांना मिळणार मदत title=

नवी दिल्ली : शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत के वीर नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात आलं. दिल्लीतल्या विज्ञान भवनात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या अॅपचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अभिनेता अक्षय कुमारही उपस्थित होता.  

वेबसाईटच्या माध्यमातून सामान्य जनतेला शहीदांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक मदत पाठवता येईल. भारत के वीर मोबाईल अॅपसुद्धा यावेळी लॉन्च करण्यात आलं. या अॅप किंवा वेबसाईटवरून केलेली आर्थिक मदत ही थेट शहीदांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा होईल. या पोर्टल किंवा अॅपच्या माध्यमातून १५ लाखांपर्यंतची मदत करता येणार आहे. पोर्टलच्या माध्यमातून बीएसएफच्या जवानांशी जनतेचा संपर्कही वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

अशा प्रकारचं एक अॅप बनवण्याची मागणी खिलाडी अक्षय कुमारनं केली होती. अक्षयच्या या कल्पनेला केंद्र सरकारनं सत्यात उतरवलं आणि आता सामान्य नागरिकालाही शहिदांना मदत करता येणार आहे.