भारताचा पाकिस्तानला ७२ तासांचा अल्टीमेटम

पंजाबमधील पठानकोट येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अल्टीमेटम दिला आहे.

Updated: Jan 4, 2016, 07:04 PM IST
भारताचा पाकिस्तानला ७२ तासांचा अल्टीमेटम title=

नवी दिल्ली : पंजाबमधील पठानकोट येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अल्टीमेटम दिला आहे. हे दहशदवादी जैश-ए-मोहम्मद असल्याचं समोर आलंय त्यामुळे या संघटनेविरोधात लगेचच कारवाई करण्यासाठी भारताने पाकिस्तानला सांगितलं आहे.

भारताने पाकिस्तानला कारवाईसाठी ७२ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. जर जैश-ए-मोहम्मद या संघटनेवर कारवाई नाही केली तर १५ जानेवारी रोजी होणारी दोन्ही देशांमधील विदेश सचिव वार्ता रद्द केली जावू शकते.