भारताने पाकिस्तानच्या १२ कैद्यांची सुटका केली रद्द

पाकिस्तानच्या १२ कैद्यांच्या सुटकेवर रोख

Updated: Apr 10, 2017, 07:49 PM IST
भारताने पाकिस्तानच्या १२ कैद्यांची सुटका केली रद्द title=

नवी दिल्ली : माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर यंत्रणेचे सदस्य असल्याचा पाकिस्तानने आरोप करत फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे भारतांना यावर कडक भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानच्या १२ कैद्यांच्या सुटकेवर रोख लावली आहे.

भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाक उच्चायुक्तांना समन्स बजावलाय. आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन झाल्यास ही हत्या असल्याचं समजण्यात येईल असा सज्जड इशारा भारतानं पाकिस्तान उच्चायुक्तांना दिला आहे.

पाकिस्तान मधील या कैद्यांनी २ दिवसानंतर सुटका होणार होती. भारत पाकिस्तान विरोधात आणखी काही कठोर पाऊलं उचलण्याची शक्यता आहे.

३ मार्च २०१६ मध्ये जाधव यांना पाकिस्तानातल्या बलूचिस्तानमधल्या मश्केल येथून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानच्या फिल्ड जनरल कोर्ट मार्शलद्वारे कुलभूषण जाधव यांच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. कुलभूषण जाधव भारतीय हेर असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपाचा, भारत सरकारनं पहिल्यापासूनच इन्कार केला होता. कुलभूषण जाधव माजी भारतीय नौदल अधिकारी असून, नोकरी सोडल्यानंतर जाधव यांचा भारत सरकार तसंच भारतीय नौदलाची काहीही संबंध नसल्याचं भारत सरकारनं आधीच स्पष्ट केलं आहे.