नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य आधी शोधा, भारतरत्न नको!

स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देऊन गौरविलं जाणार असल्याच्या चर्चेचं पेव फुटलं असताना खुद्द नेताजींच्या नातेवाईकांनी मात्र या चर्चेत स्वारस्य दाखविण्याऐवजी आधी नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य शोधण्याचं आवाहन केलं आहे़

PTI | Updated: Aug 11, 2014, 01:04 PM IST
नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य आधी शोधा, भारतरत्न नको! title=

कोलकाता : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देऊन गौरविलं जाणार असल्याच्या चर्चेचं पेव फुटलं असताना खुद्द नेताजींच्या नातेवाईकांनी मात्र या चर्चेत स्वारस्य दाखविण्याऐवजी आधी नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य शोधण्याचं आवाहन केलं आहे़

नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी याबाबत आपली भूमिका मांडली़ आमच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य नेताजींना भारतरत्न देण्याच्या विरोधात आहे.

यापेक्षा नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य शोधा़ नेताजी १९४५ पासून गायब आहेत़ तुम्ही त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविणार असाल तर त्यांचा मृत्यू कधी झाला, हे तुम्हाला सांगावं लागेल पण याचे पुरावे कुठे आहेत? असा सवाल चंद्रकुमार यांनी केला़ नेताजींच्या गायब होण्यामागच्या सत्याचा खुलासा करणें, यासंदर्भातील शासकीय दस्तऐवज सार्वजनिक करणं हाच नेताजींचा सर्वोच्च सन्मान ठरेल. 

आमच्या कुटुंबात सुमारे ६० सदस्य आहेत यापैकी कुणीही नेताजींच्यावतीनं भारतरत्न स्वीकारण्यास इच्छुक नाही, असा दावाही त्यांनी केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.