बिहारमध्ये रेल्वेवर नक्षली हल्ला, तीन जवान शहीद

बिहारमध्ये नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात जीआरपीचे तीन जवान शहीद झालेत. जमालपूरमध्ये दानापूर-साहेबगंज इंटरसिटी एक्स्प्रेसवर नक्षलींनी हल्ला केला. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात आज संध्याकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात दोन जवान जखमीही झाले आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 30, 2013, 10:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
बिहारमध्ये नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात जीआरपीचे तीन जवान शहीद झालेत. जमालपूरमध्ये दानापूर-साहेबगंज इंटरसिटी एक्स्प्रेसवर नक्षलींनी हल्ला केला. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात आज संध्याकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात दोन जवान जखमीही झाले आहेत.
जवळपास २०० नक्षलींनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात येतंय. लुटण्याच्या इराद्यानं हा हल्ला झाल्याचं बिहार पोलिसांनी म्हटलंय. या घटनेमुळं नक्षलींचा धुमाकूळ सुरु असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.
जमालपूर रेल्वे पोलीस अधिक्षक अमिताभ कुमार दास यांनी सांगितलं की शहीदांमध्ये हवालदार अशोक कुमार, भोला ठाकूर आणि उदय सिंह यांचा समावेश आहे. त्यांनी सांगितलं की या हल्ल्यातील जखमी मोहम्मद इम्तियाज आणि विनय कुमारला उपचारासाठी जमालपूरमधील रेल्वे रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय.
जमालपूर इथला रेल्वे पूल आणि आशिकपूर रेल्वे पूल दरम्यान धावत्या गाडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. जवानांजवळ असलेल्या पाच ऑटोमॅटिक रायफल नक्षलवाद्यांनी लुटल्या. या घटनेनंतर नक्षलवादी जमालपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचताच हत्यारांसह फरार झाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.