५२ हजार बेपत्ता, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित

उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवलाय. उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. अनेक जण दलदलीत अडकून पडलेत. काही जण मृतांजवळच आपला जीव मुठीत घेऊन गोठवणाऱ्या थंडीत आहेत. उपाशीपोटी हजारो पर्यटक अडकून पडलेत. आता उत्तराखंडमध्ये जलप्रलयानंतर आता मदतकार्य वेगानं सुरू झालंय. अद्याप ५२ हजार जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 20, 2013, 07:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवलाय. उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. अनेक जण दलदलीत अडकून पडलेत. काही जण मृतांजवळच आपला जीव मुठीत घेऊन गोठवणाऱ्या थंडीत आहेत. उपाशीपोटी हजारो पर्यटक अडकून पडलेत. आता उत्तराखंडमध्ये जलप्रलयानंतर आता मदतकार्य वेगानं सुरू झालंय. अद्याप ५२ हजार जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आलेय.
बुधवारी संध्याकाळी रुद्रप्रयाग ते घणसाळी, मायळी-तीलवाडा रस्ता सुरू करण्यात आला. त्यामुळे गौरीकुंड इथं अडकलेले प्रवासी परतण्यास सुरूवात झालीये. दरम्यान, या फ्लॅश फ्लडमधील मृतांचा आकडा दिडशेवर पोहोचला असताना अद्याप ५२ हजार जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे हा आकडा काही हजारांत जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान, आता वर्षभरासाठी केदारनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. देशभरातील हजारो पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये जागोजागी अडकून पडलेले आहेत. गोठणाऱ्या थंडीत, अनेक ठिकाणी जेवणा-पाण्याविना त्यांना रहावं लागतय. महाराष्ट्र राज्यातूनही हजारो पर्यंटक सध्या उत्तराखंडमध्ये असून, त्यातील अनेक जणांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. उत्तराखंड आणि राज्य सरकारकडून देण्यात येणारी मदत अपुरी ठरतेय. प्रलयानंतर अनेक ठिकाणी पर्यंटकांना मदत मिळण्याऐवजी लूट सुरु असल्याचे प्रकार वाढले आहेत.

महाप्रलयानंतर आता मृतांच्या टाळूनवरचं लोणी खाण्याचे प्रकारही सुरु झाले आहेत. उत्तराखंडमध्ये अडकेल्याले नातेवाईक सोनवटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या ही विदारक परिस्थिती झी २४ तासवर मांडली. उत्तराखंडच्या महाप्रलयात पुण्यातले पर्यटकही अडकलेत. ७० पैकी २० पर्यटकांशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
हे सर्व पर्यटक शिवगौरी ट्रॅव्हल्स कंपनीसह उत्तराखंडमध्ये गेलेत. त्यांच्यासह या ट्रॅव्हल्स कंपनीचे मालकही आहेत. आमदार विलास लांडे यांनी या पर्यटकांशी संपर्क साधलाय. प्रलयात अडकलेल्या पर्यटकांबाबत सरकारनं दिलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये तफावत असल्याचा आरोप लांडे यांनी केलाय. जलप्रलयात अडकलेल्यांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातले भाविक असल्याच समोर येतयं. रायगडमधील १०२ भाविक या जलप्रलयात सापडल्याचं समोर येतयं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.