मी दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अखंड महाराष्ट्राची घोषणा केलीय. मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केलीय. 

Updated: Oct 7, 2014, 12:41 PM IST
मी दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही - मोदी title=

​दोंडाईचा, धुळे: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अखंड महाराष्ट्राची घोषणा केलीय. मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केलीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेकडून सातत्यानं भाजपवर वेगळा विदर्भ आणि वेगळी मुंबई करणार असल्याचा आरोप होतोय. या आरोपावरच मोदींनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून मुंबईशिवाय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राशिवाय देश अपूर्ण असल्याचं मोदी म्हणाले.

छोट्या राज्यांविषयी भाजपची नेहमीच पॉझिटिव्ह भूमिका राहिलीय. भाजपच्या विदर्भातील नेत्यांनी सातत्यानं वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरली होती. आता मात्र मोदींनी अखंड महाराष्ट्राची घोषणा केल्यानं भाजपचे विदर्भवादी नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता त्यांची भूमिका काय असेल हे पाहाणं औत्युक्याचं ठरणार आहे. 

विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा इथं मोदींची पहिली सभा झालीय. मोदींनी बोलतांना काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवर जोरदार टीका केलीय. या सरकारमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचं आणि सरकारचा नुकसान केल्याचा आरोप केलाय. . 

पाहा मोदींच्या भाषणातील मुद्दे - 

  • पंतप्रधान मोदींचा खान्देश दौरा
  • दोंडाईचामध्ये पहिल्यांदा मोदींची सभा... 
  • चार महिन्यांनी मी पुन्हा आलोय... मी राजनेता नाही तर देशाचा सेवक आहे... मी वचन पूर्ण करायला आलोय... ६० महिने पूर्ण झाल्यावर मी एक-एक दिवसाचा हिशोब देईल...
  • मी तुम्ही पिकवलेला कांदा खाल्लाय, तुमचं सुख हे माझं सुख आहे... काँग्रेससारखे खोटे आश्वासनं देणार नाही... काँग्रेसनं मनमाड-इंदूर रेल्वे ट्रॅक बनविण्याचं आश्वासन ५० वर्षात पूर्ण करणार नाही...
  • काँग्रेसवाले बेशरम आहे, खोट्यावर खोटं बोलतात... 
  • छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे कुणी तुकडे करू शकणार आहे का? काही लोकं हे खोटं पसरवत आहे की, मुंबईला राज्यापासून वेगळं करू पाहत आहे, मात्र महाराष्ट्रापासून मुंबई कोणीही वेगळं करणार नाही... हे लोक खोटं बोलत आहेत... 
  • मी दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही - मोदी
  • शिवसेना, मनसे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या टीकेला मोदींचं सडेतोड उत्तर
  • महाराष्ट्राबाबत काँग्रेसकडून खोटा प्रचार, मी दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्र अखंड
  • मुंबईशिवाय महाराष्ट्र अपूर्ण आणि महाराष्ट्राशिवाय देश अपूर्ण
  • जेवढी चिखलफेक कराल, तेवढं कमळ फुलेल- मोदी
  • १५ ऑक्टोबर १५ वर्षांपासून राज्यातील जनतेचा मुक्तीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे
  • काँग्रेस-राष्ट्रवादीवर सिंचन घोटाळ्यावरून टीका
  • महाराष्ट्रात १ वर्षात ३,७०० शेतकऱ्यांची आत्महत्या... यासाठी जबाबदार असलेल्या सरकारला शिक्षा व्हायला हवी... 
  • देशातील बँकांमध्ये जेवढा पैसा आहे, तो गरीबांसाठी आहे... सर्व गरीब जनतेसाठी प्रधानमंत्री जन-धन योजना सुरू केली... एका आठवड्यात १ कोटी बँक खाते उघडले...
  • मी गरीबी पाहिली आहे, माझं बालपण गरीबीत गेलंय, म्हणून मला कोणा गरीबांच्या घरात जावून फोटो काढण्याची गरज नाही- मोदी
  • गरीबांना १ लाख रुपयांचा विमा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.