'महाराष्ट्राला जिंकायला अफजल खानाची फौज आलीय'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांत टिका केलीय. 

Updated: Oct 6, 2014, 03:48 PM IST
'महाराष्ट्राला जिंकायला अफजल खानाची फौज आलीय' title=

तुळजापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांत टिका केलीय. 

‘दिल्लीवरुन महाराष्ट्र जिंकायला अफझल खानाची फौज आली आहे… त्यांना महाराष्ट्राचे टुकडे पाडायचे आहेत’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आत्ताआत्तापर्यंतच्या सहकारी असेलल्या पक्षावर घणाघाती आरोप केलाय.  

विकासाच्या आडून महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्यांना मतं देऊ नका आणि त्यांच्या भूलथापांनाही बळी पडू नका आणि त्यांना भीक घालू नका... असं आवाहनंही यावेळी उद्धव ठाकरेंनी केलंय. 

भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा चेहराच नाही, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी तुळजापूरच्या सभेत केलाय. ‘दिल्लीच्या तालावर शेपूट हलवणारा मुख्यमंत्री तुम्हाला हवाय का? महाराष्ट्राला गरज आहे ती कणखर मुख्यमंत्र्याची... विशेष म्हणजे राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे राज्य असण्याची काहीही गरज नाही... मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातचा विकास झालाच की (यावेळी केंद्रात काँग्रेसचं राज्य होतं)... त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्याच्या विरोधात उभं आपल्याला राहायला हवं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलंय. 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.