भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात अण्णांचा एल्गार

भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एल्गार पुकारलाय.वर्धा ते दिल्ली अशी ते पदयात्रा काढणार आहेत.

Updated: Mar 9, 2015, 09:52 AM IST
भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात अण्णांचा एल्गार title=

वर्धा : भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एल्गार पुकारलाय.वर्धा ते दिल्ली अशी ते पदयात्रा काढणार आहेत.

ही पदयात्रा आणि आंदोलनाची रुपरेषा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात ठरणार आहे. यासाठी देशभरातील चाळीस शेतकरी नेत्यांसह अण्णांची बैठक सकाळी अकरा वाजता सेवाग्राम आश्रमात होणार आहे.

हे विधेयक पंतप्रधान मोदी मागे का घेत नाही असा सवाल उपस्थित करत जेलभरो आंदोलनाचा पुनरुच्चार अण्णांनी केलाय.

दरम्यान आपचे नाराज नेते योगेंद्र यादव हे देखील या बैठकीत सहभागी होणार असल्यानं याबाबत अनेक तर्क काढले जात आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.