भाजप सरकार निर्णय घेते, अंगाशी आल्यावर बदलते : राज ठाकरे

सरकार निर्णय घेतं आणि अंगाशी आल्यावर तो बदलतो ही भाजप सरकारची अवस्था असल्याचा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. 

Updated: Feb 23, 2016, 06:32 PM IST
भाजप सरकार निर्णय घेते, अंगाशी आल्यावर बदलते : राज ठाकरे title=

रत्नागिरी : सरकार निर्णय घेतं आणि अंगाशी आल्यावर तो बदलतो ही भाजप सरकारची अवस्था असल्याचा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. 

भाजपवर टीका करताना सेनाचा समाचार घेतला. सत्तेत राहून विरोध करणाऱ्या शिवसेनेचा हा खोटारडेपणा आहे. सरकारमध्ये राहून विरोध करण्यापेक्षा बाहेर पडा असे खडे बोल त्यांनी सुनावलंय. 

खेड नगरपरिषदेच्या विकास कामांचे उदघाटन करण्यासाठी आले असता ते बोलत होते. तर कोकणात येणाऱ्या केमिकल झोनला आपला विरोध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर सरकार अस्थिर करण्याच्या मुद्यावरून राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय चिमटे काढले.