मेहतांसाठी मुख्यमंत्र्यांची दिलगिरी

महाड दुर्घटनेबाबत प्रश्न विचारणाऱ्या साम टीव्हीचे पत्रकार मिलिंद तांबे यांना रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी दमदाटी केली.

Updated: Aug 5, 2016, 07:41 PM IST
मेहतांसाठी मुख्यमंत्र्यांची दिलगिरी  title=

मुंबई : महाड दुर्घटनेबाबत प्रश्न विचारणाऱ्या साम टीव्हीचे पत्रकार मिलिंद तांबे यांना रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी दमदाटी केली. याप्रकरणी प्रकाश मेहतांनी माफी मागितल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे. 

भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींना दिलं आहे. मुंबई प्रेस क्लब, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आणि इतर पत्रकार संघटनांनी मेहतांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. 

पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं. हे निवदेन दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रतिनिधींसमोर दिलगिरी व्यक्त केली आहे.