रत्नागिरीत कॉलेजमध्येच तरुणीवर चाकू हल्ला, प्रकृती गंभीर

रत्नागिरीत एका तरुणीवर चाकू हल्ला झालाय. जिल्ह्यातील देवरुख-आंबवमधील राजेंद्र माने इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये दुपारी ही घटना घडली. या तरुणीला एका तरुणानं भोसकलयं. 

Updated: Aug 6, 2014, 05:40 PM IST
रत्नागिरीत कॉलेजमध्येच तरुणीवर चाकू हल्ला, प्रकृती गंभीर title=

रत्नागिरी: रत्नागिरीत एका तरुणीवर चाकू हल्ला झालाय. जिल्ह्यातील देवरुख-आंबवमधील राजेंद्र माने इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये दुपारी ही घटना घडली. या तरुणीला एका तरुणानं भोसकलयं. 

या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रत्नागिरीला हलवण्यात आलयं. तरुण आणि तरुणी दोघेही पाचगणीचे राहणार आहेत. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असल्याचं तरुणीच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. 

ही तरुणी जेवण आटोपून कॉलेजमध्ये जात असताना तिच्या मूळगावचा म्हणजेच पाचगणीतील तरुणानं रस्ता रोखून तिच्यावर वार केले. त्यानंतर हा तरुण फरार झाला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x