शिवसेनने पाठिंबा काढला तरी सरकार स्थिर - आठवले

शिवसेनेने जरी सरकारचा पाठींबा काढला तरी सरकार पडणार नाही.. सध्या सरकारकडे बहुमत असल्यामुळं मध्यावधी निवडणुका होणार नाहीत असं सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारलीय... 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 24, 2017, 07:54 PM IST
शिवसेनने पाठिंबा काढला तरी सरकार स्थिर - आठवले  title=

बारामती : शिवसेनेने जरी सरकारचा पाठींबा काढला तरी सरकार पडणार नाही.. सध्या सरकारकडे बहुमत असल्यामुळं मध्यावधी निवडणुका होणार नाहीत असं सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारलीय... 

विरोधकांकडून राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचं नाव घेतलं जात असलं तरी ते निवडणूक लढवणार नाहीत.. मात्र त्यांनी जर एनडीएत प्रवेश केला तर नरेंद्र मोदी त्यांचा राष्ट्रपतीपदासाठी विचार करतील असंही आठवले यांनी म्हटलंय.. 

एका कार्यक्रमानिमित्त जाताना रामदास आठवले यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आरपीआयचा पाठींबा असून त्या दृष्टीने सरकार पावलं टाकत असल्याचं आठवले यांनी सांगितलं.. विरोधकांनी कर्जमाफीसाठी रक्कम उभारण्याबाबत शासनाला सुचवावं असंही त्यांनी म्हटलंय..