पाऊस नसल्याने खानदेशात भीषण परिस्थिती

पाऊस नसल्याने खानदेशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात अजूनही खानदेशात पाऊस झालेला नाही. 

Updated: Jul 6, 2014, 10:10 AM IST
पाऊस नसल्याने खानदेशात भीषण परिस्थिती title=

जळगाव : पाऊस नसल्याने खानदेशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात अजूनही खानदेशात पाऊस झालेला नाही. 

जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकमधील कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळात हीच परिस्थिती आहे. औषधाला धरणं असलेल्या खानदेशात यामुळे काही ठिकाणी लवकरचं पाण्याचं संकट निर्माण होणार आहे.

कितीही भीषण परिस्थिती निर्माण झालेली असली, तरी सरकारच्या नावाने कधीही गळा न काढणारा खानदेशातला शेतकरी आजही पाऊस येईल, सर्व काही सावरता येईल, अशी आस लावून बसला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.