आता 302 कलम कुणावर दाखल करायचं ?, सुप्रियांचा सवाल

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करताना म्हटलंय, "आमचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या व्हायच्या, तेव्हा आताचे मुख्यमंत्री 302 कलम लावण्याची मागणी करायचे. आता तुमचं सरकार असतानाही आत्महत्या होतायत. आता 302 कलम कुणावर दाखल करायचं?".

Updated: Apr 22, 2016, 01:06 AM IST
आता 302 कलम कुणावर दाखल करायचं ?, सुप्रियांचा सवाल title=

औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करताना म्हटलंय, "आमचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या व्हायच्या, तेव्हा आताचे मुख्यमंत्री 302 कलम लावण्याची मागणी करायचे. आता तुमचं सरकार असतानाही आत्महत्या होतायत. आता 302 कलम कुणावर दाखल करायचं?".

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे दुष्काळी भागाच्या दौर्‍यावर आहे. आज औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. मराठवाड्याची परिस्थिती भीषण आहे. पाणी टंचाई, चारा छावण्या, शेतकर्‍यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्न आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज मराठवाड्याच्या दुष्काळी दौर्‍याला औरंगाबादहून सुरुवात केली. औरंगाबादहून त्यानी जालना, बीड या जिल्ह्यातील शेतकयांशी संवाद साधला, चारा छावण्याची पाहणी केली.