'ठाण्यातली शिवसेना आनंद दिघेंची राहिली नाही'

ठाण्यामधील शिवसेना ही आता आनंद दिघेंची राहिली नसून ती नातेवाईकांची आणि स्वार्थी लोकांची शिवसेना झाली असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Updated: Feb 19, 2017, 08:48 PM IST
'ठाण्यातली शिवसेना आनंद दिघेंची राहिली नाही' title=

ठाणे : ठाण्यामधील शिवसेना ही आता आनंद दिघेंची राहिली नसून ती नातेवाईकांची आणि स्वार्थी लोकांची शिवसेना झाली असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची शेवटची सभा मुख्यमंत्र्यांनी ठाण्यामध्ये घेतली. या सभेतही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवरच निशाणा साधला.

ठाण्यामध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी आपल्या घरामध्येच तिकीटं वाटली, त्यामुळे उद्धव ठाकरेंची सभा कोणत्या नातेवाईकांकडे होईल, यावरून वाद झाल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.