मी काहीही बोललो तरी गाजावाजा का?- अजितदादांचा सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वक्तव्यांवरून नेहमीच वादात सापडतात. मात्र यावेळी त्यांनी मीडियावर शरसंधान साधलंय. “मी काहीही बोललो तरी इतका गाजावाजा होतो, पण बाकी लोक इतकं बोलतात त्यांचं काय?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Updated: Jul 20, 2014, 11:14 PM IST
 मी काहीही बोललो तरी गाजावाजा का?- अजितदादांचा सवाल title=

नाशिक: उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वक्तव्यांवरून नेहमीच वादात सापडतात. मात्र यावेळी त्यांनी मीडियावर शरसंधान साधलंय. “मी काहीही बोललो तरी इतका गाजावाजा होतो, पण बाकी लोक इतकं बोलतात त्यांचं काय?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

नाशिकमध्ये आयोजित निर्धार मेळाव्यात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, “माझ्याकडून एक शब्द चुकून बोलला गेला तर इतका गाजावाज करण्यात आला की मला एक दिवस यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर दिवसभर बसावे लागलं”, बाकी नेते खूप काही बोलतात मात्र त्यांचं झाकून ठेवलं जातं आणि आमचे मात्र वरवर करून दाखविलं जातं, असा टोला लगावला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.