यवतमाळ जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात २ ठार

जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

Updated: Sep 6, 2016, 10:23 PM IST

यवतमाळ : जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

राळेगावच्या खैरगाव कासार इथल्या शेतकरी मारोती नागोसे याला वाघाने ठार मारल्यानंतर पाचमोह जंगलात सखाराम टेकाम याला देखील वाघाने ठार केल्याचं समोर आलंय.

झोटिंगदरा पांढरकवडा इथे राहणारे खाराम टेकाम घरी न परतल्यामुळे त्यांचा शोध सुरु होता. अखेर लचके तोडलेल्या स्थितीत सखारामचे शव मिळाले. 

या परिसरात मागील काही महिन्यांपासून वाघाचा मुक्त वावर सुरू आहे. अनेक जनावरांचा फडशा त्याने पाडला. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.