कोल्हापुरात टोलनाक्याची नागरिकांकडून तोडफोड

कळंबा टोलनाक्यावर संतप्त नागरिकांनी तोडफोड केलीय. 

Updated: Apr 4, 2015, 11:51 PM IST
कोल्हापुरात टोलनाक्याची नागरिकांकडून तोडफोड title=

कोल्हापूर : कळंबा टोलनाक्यावर संतप्त नागरिकांनी तोडफोड केलीय. 

टोल देण्यास नकार दिल्यानंतर वाहनधारकाला दमदाटी करण्याचा आणि वाहनाचं नुकसान करण्याचा प्रकार टोल कर्मचा-यांनी केलाय. त्यामुळं संतप्त नागरिकांनी कर्मचा-यांना पिटाळून लावत टोलनाक्याची केबीन उद्धवस्त केली. 

नुकतीच आयआरबीने टोल दरात वाढ करून कोल्हापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळलंय... त्यामुळे अगोदरच संतप्त झालेल्या कोल्हापुराकारातून टोलविरोधात पुन्हा उद्रेक होताना दिसतोय.

सरकारने जर दिलेला शब्द पाळला नाही तर कोल्हापुरात टोल विरोधात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.