मुंबईवरून बाळासाहेबांचा 'ठाकरी' हल्ला

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या टीकेचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतलाय.

Updated: Nov 3, 2011, 06:39 AM IST


झी २४ तास वेब टीम, मुंबई

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या टीकेचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतलाय.

अरे तबेल्यातल्या टोणग्यांनो... या शिर्षकाखाली अग्रलेख लिहिला आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून तिच्यावर मराठी माणसांचाच पहिला हक्क असल्याचा पुनरुच्चार ठाकरेंनी केलाय.

 

सध्या मुंबईतील उत्तर भारतीयांच्या फुटकळ नेत्यांना बर्‍यापैकी प्रसिद्धी मिळत आहे. किंबहुना प्रसिद्धी मिळावी म्हणूनच हे तबेल्यातले टोणगे गोठ्यातल्या स्वत:च्याच शेणात लोळत असतात. संख्याबळावर मुंबई ‘ठप्प’ करण्याची भाषा तोंडास डायरिया झालेल्या टिनपाटांनी केली, अशी टीका करण्यात आली आहे.