यंदाची प्रवेशाची 'कट ऑफ'ही वाढणार!

 बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांपुढं टेंशन आहे ते प्रवेशाचं... यंदा मुंबईतल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा वाढणार असंच दिसतंय. 

Updated: May 27, 2015, 08:44 PM IST
यंदाची प्रवेशाची 'कट ऑफ'ही वाढणार! title=

मुंबई :  बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांपुढं टेंशन आहे ते प्रवेशाचं... यंदा मुंबईतल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा वाढणार असंच दिसतंय. 

कारण, यंदा आयएससी आणि एसएससी या दोन्ही बोर्डाचे मुंबईचे निकाल हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक आहेत. दोन्ही बोर्डाची निकालाची टक्केवारी वाढल्यानं प्रवेशासाठीची 'कट ऑफ'ही वाढणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रवेशाच्या जागा पुरेशा असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल पण हव्या त्या स्ट्रीमसाठी हवं ते कॉलेज मिळवताना विद्यार्थ्यांना त़डजोड करावी लागण्याची शक्यता आहे. 

कॉलेजेसची कट ऑफ वाढणार असल्याने विद्यार्थ्यांचीही डोकेदुखी वाढणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.