दीड दिवसांच्या बाप्पांना जड अंत:करणानं निरोप

गुरुवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घराघरांत आगमन झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पांना आज भाविकांनी जड अंत:करणानं निरोप दिला. 

Updated: Sep 19, 2015, 05:23 PM IST
दीड दिवसांच्या बाप्पांना जड अंत:करणानं निरोप  title=

मुंबई : गुरुवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घराघरांत आगमन झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पांना आज भाविकांनी जड अंत:करणानं निरोप दिला. 

बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईत चौपाट्यांवर तसंच कृत्रिम तलावांवर भक्तांनी मोठी गर्दी केली होती. दीड दिवसांच्या गणेशांमध्ये घरगुती बाप्पांचं प्रमाण मोठं असतं.

या बाप्पाचं विसर्जन करताना भाविकांचं मन भरून आलं होतं... याच मुहूर्तावर बराच काळ गायब झालेल्या पावसानंही पुन्हा ठिकठिकाणी दमदार आगमन केलंय. भाविकांनीही बाप्पाकडे 'पाऊस पडू दे... आणि शेतकऱ्यांना आनंदी कर' अशीच प्रार्थना केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.