मुंबई हातातून गेली तर परत आणता येणार नाही-राज ठाकरे

आपण मराठी माणसासाठी शिवसेनेकडे हात पुढे केला होता, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 2, 2017, 12:15 AM IST
मुंबई हातातून गेली तर परत आणता येणार नाही-राज ठाकरे title=

मुंबई : आपण मराठी माणसासाठी शिवसेनेकडे हात पुढे केला होता, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे, आजही मुंबई मिळवण्यासाठी काही गोष्टी शहा आणि मोदी यांच्या डोक्यात आहेत, यासाठी हे सर्व चाललं आहे.

एकदा मुंबई हातातून गेली तर ती परत मिळवता येणार नाही, ही वाळवी आहे, लागली तर कळणार नाही, भुसाच हातात येईल, असं भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं आहे.

राष्ट्रीय पक्षांना राज्यांची भावना कळत नाही, राष्ट्रीय पक्षांना तुमच्याबद्दल काही घेणं देणं नाही, दिल्लीत मराठी मुलांना मारल्यावर हिंदी चॅनेल्स गप्प का असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.