टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय, टी-२० मालिका खिशात

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत. टी-२० मालिका खिशात टाकली. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. 

Updated: Jan 29, 2016, 05:51 PM IST
 टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय, टी-२० मालिका खिशात title=

मेलबर्न :  टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत. टी-२० मालिका खिशात टाकली. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. त्यामुळे तिसऱ्या टी-२० सामन्यात मोठ्या आत्मविश्वासाने टीम मैदानात उतरेल.

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने विजयासाठी १८५ धावांचे आव्हान ठेवलेय. रोहित शर्माच्या तडाखेबंद ६० आणि विराट कोहलीच्या नाबाद ५९ धावांच्या जोरावर भारताला दीडशेपार मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या सलामीच्या जोडीने शानदार सुरुवात केली. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचली. धवन ४२ धावांवर मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचं अर्धशतक ८ धावांनी हुकलं. धवन बाद झाल्यानंतर रोहितने कोहलीसह धावसंख्या वाढवण्यास सुुरुवात केली. या दोघांनी ४६ धावा केल्यानंतर रोहित ६० धावांवर तंबूत परतला. चौथ्या क्रमांकावर खेळायला येणाऱ्या धोनीने पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेत सुरुवात केली. मात्र पुल करण्याच्या नादात १४ धावा करुन बाद झाला. या दरम्यान विराटनेही अर्धशतक पूर्ण केले. त्याने नाबाद ५९ धावा केल्या. 

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड