विराट नाही तर धोनीच्या नेतृत्वात झाला भारताचा विजय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा रोमहर्षक विजय झाला. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये भारतानं ही मॅच फिरवली आणि सीरिजमध्ये कमबॅक केलं.

Updated: Jan 30, 2017, 05:25 PM IST
विराट नाही तर धोनीच्या नेतृत्वात झाला भारताचा विजय  title=

नागपूर : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा रोमहर्षक विजय झाला. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये भारतानं ही मॅच फिरवली आणि सीरिजमध्ये कमबॅक केलं. इंग्लंडला शेवटच्या तीन ओव्हरमध्ये फक्त 27 रन हवे होते आणि त्यांच्या 6 विकेट बाकी होत्या.

या परिस्थितीमध्ये नुकतंच कर्णधारपद घेतलेला कोहलीवरही दबाव वाढला होता, त्यामुळे तो धोनीकडे धावला. यानंतर धोनीनंही त्याच्या कर्णधारपदाच्या अनुभवाचा पुरेपुर वापर केला आणि फिल्डिंग लावली, त्यामुळे धोनीची नेतृत्व क्षमता पुन्हा एकदा दिसून आली.