दुसऱ्या टी20 मध्ये भारताचा सनसनाटी विजय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा 5 रननं विजय झाला आहे.

Updated: Jan 29, 2017, 11:33 PM IST
दुसऱ्या टी20 मध्ये भारताचा सनसनाटी विजय  title=

नागपूर : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा 5 रननं विजय झाला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 8 रनची आवश्यकता असताना बुमराहनं फक्त दोन रन दिल्या आणि इंग्लंडच्या दोन बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. विजयासाठी 145 रनचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 139/6 एवढी मजल मारता आली.

इंग्लंडपुढे 145 रनचं माफक आव्हान ठेवल्यानंतर भारतीय बॉलर्सनी उल्लेखनीय कामगिरी केली. आशिष नेहरानं सर्वाधिक तीन तर जसप्रीत बुमराहनं दोन विकेट घेतल्या. अमित मिश्राला एक विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून जो रूट आणि बेन स्टोक्सनं प्रत्येकी 38 रन केल्या.

याआधी इंग्लंडनं टॉस जिंकून भारताला बॅटिंगला पाठवलं, पण मागच्या मॅचप्रमाणेच या मॅचमध्येही भारताची बॅटिंग ढेपाळली. राहुलनं सर्वाधिक 71 रन केल्या तर मनिष पांडेनं 31 आणि विराट कोहलीनं 21 रन केल्या.