भारतीय गोलंदाजांनी प्रथमच केला असा रेकॉर्ड

भारताने क्रिकेट इतिहासात आज सामना जिंकत एक विक्रम केला आहे. प्रथमच सातव्या क्रमांकानंतर येणाऱ्या खेळाडूंनी एका डावात अर्धशतके ठोकण्याची कामगिरी केली आहे. आश्विन, जडेजा आणि जयंतने एका डावात अर्धशतके झळकावली आहेत. मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या शेवटच्या फलंदाजांनी 134 धावा जोडल्या. जडेजाने ९०, अश्विनने 72 आणि जयंतने 52 धावांची खेळी केली. भारतीय संघात अशी कामगीरी प्रथमच झाली.

Updated: Nov 29, 2016, 05:54 PM IST
भारतीय गोलंदाजांनी प्रथमच केला असा रेकॉर्ड title=

मोहाली : भारताने क्रिकेट इतिहासात आज सामना जिंकत एक विक्रम केला आहे. प्रथमच सातव्या क्रमांकानंतर येणाऱ्या खेळाडूंनी एका डावात अर्धशतके ठोकण्याची कामगिरी केली आहे. आश्विन, जडेजा आणि जयंतने एका डावात अर्धशतके झळकावली आहेत. मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या शेवटच्या फलंदाजांनी 134 धावा जोडल्या. जडेजाने ९०, अश्विनने 72 आणि जयंतने 52 धावांची खेळी केली. भारतीय संघात अशी कामगीरी प्रथमच झाली.
 
अश्विन-जडेजाने ९७ धावांची पार्टनरशिप करत भारताला पहिल्या डावात ४१७ धावांपर्यंत पोहोचवलं. जडेजाने यापूर्वी २०१४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध सर्वोधिक ६८ धावांची खेळी केली होती. जयंतने देखील चांगली कामगिरी केली.