विजयाचे श्रेय गोलंदाजांना - धोनी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत मिळालेल्या विजयाचे श्रेय भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजांना दिलेय. यावेळी धोनीने युवा क्रिकेटर जसप्रीत बुमराह आणि अनुभवी आशिष नेहराचे कौतुक केले.

Updated: Feb 1, 2016, 11:19 AM IST
विजयाचे श्रेय गोलंदाजांना - धोनी title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत मिळालेल्या विजयाचे श्रेय भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजांना दिलेय. यावेळी धोनीने युवा क्रिकेटर जसप्रीत बुमराह आणि अनुभवी आशिष नेहराचे कौतुक केले.

या विजयाचे श्रेय अधिकतर गोलंदाजांना जाते. वनडे मालिकेत भारताच्या क्रिकेटरनी फलंदाजीत चांगले प्रदर्शन केले मात्र गोलंदाजी तितकीशी चांगली झाली नाही. मात्र टी-२० मालिकेत गोलंदाजांनी वनडेतील कसर भरुन काढली. यावेळी टी-२० वर्ल्डकपमध्येही हाच संघ कायम राखणार असल्याचे संकेत दिले. 

टी-२० वर्ल्डकपसाठी संघात एखाद दोन बदल होऊ शकतात. मात्र बाकी संघ तोच राहील. वनडे मालिकेत पराभव झाल्यानंतर टी-२० मालिका जिंकू शकलो याचा आनंद आहे.