...तर कोहलीच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा तिसरा यशस्वी कर्णधार बनण्याच्या मार्गावर आहे. बांगलादेशविरुद्धचा एकमेव कसोटी सामना भारताने जिंकल्यास कोहलीच्या नावे आणखी एक नव्या विक्रमाची नोंद होणार आहे.

Updated: Feb 13, 2017, 09:47 AM IST
...तर कोहलीच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद  title=

हैदराबाद : विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा तिसरा यशस्वी कर्णधार बनण्याच्या मार्गावर आहे. बांगलादेशविरुद्धचा एकमेव कसोटी सामना भारताने जिंकल्यास कोहलीच्या नावे आणखी एक नव्या विक्रमाची नोंद होणार आहे.

भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा २३ पैकी १५वा विजय असेल. त्यासोबतच मोहम्मद अझरुद्दीननंतर विराट भारताचा तिसरा यशस्वी कर्णधार ठरेल. 

अझहरने आपल्या नेतृत्वाखाली ४७ कसोटींमध्ये १४ कसोटी जिंकल्या होत्या. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने ६० कसोटींमध्ये २७ सामने जिंकले होते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४९ कसोटींपैकी २१ सामने जिंकले होते.