टी-२० महिला वर्ल्डकप : पावसाचा व्यत्यय, डकवर्थ लूईसनुसार पाकिस्तान विजयी

भारत आणि पाकिस्तान महिला संघात सामना चांगलाच रंगला. विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई रंगली होती. त्यामुळे कोण जिंकणार याची उत्सुकता असतांनाच पावसानं व्यत्यय आणला आणि खेळ थांबवला गेला.

Updated: Mar 19, 2016, 07:15 PM IST
टी-२० महिला वर्ल्डकप : पावसाचा व्यत्यय, डकवर्थ लूईसनुसार पाकिस्तान विजयी title=

 नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान महिला संघात सामना चांगलाच रंगला. विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई रंगली होती. त्यामुळे कोण जिंकणार याची उत्सुकता असतांनाच पावसानं व्यत्यय आणला आणि खेळ थांबवला गेला.

काही वेळानंतर पाऊस थांबला पण डकवर्थ लूईसनुसार पाकिस्तानला विजयी ठरवण्यात आले. भारताने पहिली बँटींग केली पण भारताची सुरुवात खराब झाली आणि पाकिस्तान समोर फक्त 67 रन्सचं टार्गेच ठेवण्यात आलं.

पाकिस्तानने सुरुवात चांगली केली पण त्यानंतर त्यांच्या ही विकेट पडल्या आणि खेळ भारताच्या दिशेने झुकण्यास सुरुवात झाली पण त्यावर पावसाने पाणी फेरलं आणि पाकिस्तान विजयी ठरला.