सिंह - काम आपल्याला दूर नेते, प्रेम जवळ आणते

सिंह राशीच्या व्यक्तींना २०१२ हे साल चांगले जाणार आहे. काही अचानक किंवा अप्रत्यक्ष अडथळे येत असताना एखादी चांगली बातमी मिळूनही यावर मात करता येणार नाही. असे असलेतरी घाबरण्याची गोष्ट नाही. अथक परिश्रमामुळे आपण चांगले काम करून परिस्थितीवर मात करू शकाल.

Updated: Jan 4, 2012, 06:18 PM IST

सिंह राशीच्या व्यक्तींना २०१२ हे साल चांगले जाणार आहे. काही अचानक किंवा अप्रत्यक्ष अडथळे येत असताना एखादी चांगली बातमी मिळूनही यावर मात करता येणार नाही. असे असलेतरी घाबरण्याची गोष्ट नाही. अथक परिश्रमामुळे आपण चांगले काम करून परिस्थितीवर मात करू शकाल.

आपण पहिले सहा महिने चांगल्या कामासाठी घालाल. यातून तुम्ही चमकाल. मात्र, २०१२ या सालातील दुसऱ्या सहा महिन्यांतही आपण आनंद उपभोगू शकणार नाही.  सूर्याच्या ऊर्जेप्रमाणे आपला ऊत्साह वाढेल. हा ऊत्साह जीवनात नवं चैतन्य आणील. त्याचबरोबर आपण अधिक सक्षम व्हाल. यामुळे आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी शक्ती मिळेल. अधिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल. तसेत प्रिय व्यक्तींबरोबर चांगले काम करू शकाल. चांगले संबंध निर्माण होतील.

 

सिंह राशीची व्यक्ती चंचल असते. ती लगेच रागावते. यामुळे याचा उलटा परिणाम होऊ शकतो. २०१२ मध्ये कुटुंबात आपली भागिदारी असेल. मात्र, असे असले तरी आपल्याला धोका होऊ शकतो. किंवा नातेवाईक यात असहमत होतील. परंतु असा प्रकारच्या संबंधात दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे बिघडणारी स्थिती संभाळू शकाल.

२०१२ हे वर्ष प्रेम, प्रणय आणि विवाह यांच्यासाठी चांगले आहे. या सालात काही चांगले क्षण आपल्या जीवनात येतील. त्यामुळे ते आपल्या लक्षात राहील. फेब्रुवारी-मार्च हा काळ आपल्याला काही गोष्टी पुन्हा मिळवून देईल. आपले वैवाहीक जीवन शांततामय जाईल. मुले, आई-वडिल यांच्याशी चांगले संबंध निर्माण होतील. वडिलधाऱ्या माणसांची काळजी घ्याल. .यातून आपल्याला आनंद मिळेल. आनंदी जीवनामुळे तुमची प्रशंसा केली जाईल.

 

आनंददायी जीवनासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने चांगले ठरू शकतात. आपल्या परिवारासाठी वेळ द्याल. कौटुंबिक संबंध जपल्यामुळे काही आनंददायी क्षण वाट्याला येतील.२०१२ हे वर्ष लग्नासाठी चांगले आहे. आपण बचतीकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच व्यवसायासाठी हे साल चांगले आहे. व्यापाराबाबत एखादी चांगली घटना घडेल. नविन व्यवसायासाठी हे वर्ष चांगले आहे. व्यवसायातून लाभ होण्याची शक्यता आहे.

 

आपले आरोग्य जपण्यासाठी भर दिला पाहिजे. व्यायाम प्राधान्य देऊन आरोग्य जपा. व्यायाम केल्यास चिंता, काळजी दूर होईल. जुलै ते सप्टेंबर या महिन्यात तुमच्या ग्रहांची स्थिती चांगली आहे. मात्र, काही किरकोळ समस्या त्रासदायक ठरतील. महिलांना पोट दुखी, अपचन अशा काही आजारांचा सामना करावा लागेल. बदलणाऱ्या जीवन शैलीमुळे सकारात्मक परिणाम दिसून येईल. परिवर्तन, प्रेम आणि करिअरसाठी २०११ हे वर्ष चांगले असेल.

 

Tags: