जीवनात सतत प्रेम आणि ब्रेकअपचा सामना करतात 'या' 4 राशींच्या व्यक्ती

सतत प्रेम आणि ब्रेकअप... तुम्ही देखील अशा परिस्थितीचा सामना करताय का? मग तुमची 'ही' असेल रास....  

Updated: Mar 9, 2022, 10:20 AM IST
जीवनात सतत प्रेम आणि ब्रेकअपचा सामना करतात 'या' 4 राशींच्या व्यक्ती title=

मुंबई : काही सवयींसोबत अनेकांचा जन्म होतो. ज्योतिषांच्या मते  कुंडली मधील ग्रह दिशां शिवाय राशी देखील भविष्यासाठी जबाबदार असतात. व्यक्तींच्या राशी त्यांच्या स्वभावासोबतचं अनेक गोष्टी निश्चित करतात. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर, अनेक जण खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात. तर काही अनेकदा प्रेमात पडतात, पण त्यांचं ब्रेकअप देखील सतत होतं.... अशाचं काही रशींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत...

वृषभ : या रशीच्या व्यक्ती फार लवकर आकर्षित होतात आणि त्याचं गोष्टीला प्रेम समजत चुकी करतात. जास्त काळ ते कोणासोबत राहू शकत नाहीत. पण या राशीच्या व्यक्ती जर कोणावर खरंच प्रेम करत असतील, तर त्या खास व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतात. ते कायम जोडीदारासोबत एकनिष्ठ राहतात. 

मिथुन : या राशीच्या व्यक्ती आनंदी आणि चंचल स्वभावाच्या असतात. इतरांसोबत त्यांची लगेच मैत्री होते. मिथुन राशीच्या व्यक्ती प्रेमात देखील लवकर पडतात. पण एका ठिकाणी टिकू शकत नाही. त्यामुळे यांना अनेक ब्रेकअपचा सामना करावा लागतो. पण लग्नानंतर मिथुन राशीच्या व्यक्ती इमानदारीने नातं जपतात. 

तुळ : कोणतंही नातं जपण्यासाठी राशीच्या व्यक्ती मागे-पुढे पाहात नाहीत, पण काही काळानंतर जवळच्या व्यक्तींकडे देखील दुर्लक्ष करतात. ज्यामुळे नात्याचं महत्त्व कमी होतं. ज्यानंतर राशीच्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. 

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांना फक्त एका व्यक्तीसोबत बांधून राहणे आवडत नाही. या राशीच्या व्यक्ती अनेकदा प्रेमात पडतात. एवढेच नाही तर त्यांचे ब्रेकअपही लवकर होते. जेव्हा जोडीदार त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो तेव्हाच त्याचं नातं टिकतं.
(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)