एका पराभवाने आत्मविश्वास डळमळत असेल तर खेळण्याचा हक्क नाही - जसप्रीत बुमराह

साऊथ आफ्रिका दौ-याची टीम इंडियाची सुरूवात जरा निराशाजनकच झाली आहे. पहिलाच टेस्ट सामना गमावल्याने टीम इंडियाला आता वापसी करणे जरा कठिण आहे.

Updated: Jan 12, 2018, 09:31 AM IST
एका पराभवाने आत्मविश्वास डळमळत असेल तर खेळण्याचा हक्क नाही - जसप्रीत बुमराह title=

सेंचुरियन : साऊथ आफ्रिका दौ-याची टीम इंडियाची सुरूवात जरा निराशाजनकच झाली आहे. पहिलाच टेस्ट सामना गमावल्याने टीम इंडियाला आता वापसी करणे जरा कठिण आहे.

मात्र अशक्य नक्कीच नाही. अशात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एक असं वक्तव्य केलं ज्याने टीम इंडियातील खेळाडूंचा आत्मविश्वास दुप्पट होईल. 

काय म्हणाला बुमराह?

पहिल्या सामन्यात चार विकेट घेणारा बुमराह म्हणाला की, ‘एका सामन्याने आत्मविश्वास डगमगत नाही. जर तसे झाले तर तुम्ही खेळण्याचे हकदार नाहीत. चुकांमधून शिका आणि पुढे जा. कोणताही क्रिकेटर असा नाहीये ज्याने चूक केली नाही. तो चांगला टेस्ट सामना होता आणि मी त्यातून खूप काही शिकलो. कारण मी याआधी कधीही साऊथ आफ्रिकेत खेळलो नव्हतो. आता ही वेळ पुढे जाण्याची आणि दुस-या सामन्याबद्दल विचार करण्याची आहे’.

आता काय असेल प्लॅन

पहिल्या सामन्यात विकेट घेण्याचा क्षण चांगला होता. आम्ही ब-याच विकेट घेतल्या. एक गोलंदाज म्हणून मी एखादा सामना संपल्यावर जास्त उत्साहीत होत नाही, हा माझा सिद्धांत आहे. मला पुढच्या सामन्यात आत्मविश्वासाने खेळायचे असते.