IND vs NZ : हे 3 खेळाडू विराट कोहलीचे आवडते, पण आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघात काही मोठे बदल 

Updated: Nov 12, 2021, 08:57 AM IST
IND vs NZ : हे 3 खेळाडू विराट कोहलीचे आवडते, पण आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली  title=

मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये लवकर आऊट झाल्यानंतर टीम इंडिया आता 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 सीरिजमध्ये न्यूझीलंडशी भिडणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल तर केएल राहुल या संघाचा उपकर्णधार असेल. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघात काही मोठे बदल होणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला त्या तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे विराट कोहलीचे आवडते होते, परंतु रोहितच्या कर्णधारपदात स्थान मिळणे खूप कठीण असेल.

 

श्रेयस अय्यर 

हा मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. पण या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध मालिकेत झाला तेव्हा अय्यर क्षेत्ररक्षणादरम्यान जखमी झाला. तेव्हापासून सूर्यकुमार यादवला सातत्याने टीम इंडियात स्थान मिळू लागले. सूर्यकुमार यादव रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळतो आणि आता रोहितच्या नेतृत्वाखाली त्याचे संघातील स्थान निश्चित झाले आहे. पण श्रेयस अय्यरला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. T20 विश्वचषकादरम्यान अय्यरच्या जागी फक्त सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत या खास खेळाडूला संघात स्थान देणे रोहितला नक्कीच आवडेल.

यजुवेंद्र चहल 

टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल हा विराट कोहलीच्या खास खेळाडूंपैकी एक आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही चहलला संघातून वगळण्यात आले होते. त्याच्या जागी राहुल चहरची निवड करण्यात आली. राहुल बऱ्याच दिवसांपासून रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसत आहे. अशा स्थितीत कर्णधार झाल्यानंतरही रोहितला संघात निश्चितच संधी मिळेल. त्याचवेळी चहलच्या कारकिर्दीला ब्रेक लागू शकतो. रोहित त्याच्या आवडत्या खेळाडूंना संघात स्थान देणार असून, आगामी काळात राहुलची कारकीर्द निश्चितपणे घडू शकते. चहलला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी देण्यात आली आहे, मात्र त्याला संघात स्थान मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मोहम्मद सिराज 

चहलप्रमाणेच मोहम्मद सिराज देखील विराट कोहलीच्या खास खेळाडूंपैकी एक आहे. सिराजने कसोटी क्रिकेटमधील आपले स्थान पूर्णपणे पक्के केले. पण आयपीएलमधील त्याच्या चांगल्या कामगिरीनंतर त्याला टीम इंडियाच्या सीमी ओव्हरमध्येही स्थान मिळवण्याची संधी होती. मात्र, रोहित कर्णधार झाल्यानंतर हे शक्य करणं खूप अवघड आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये, सिराजने टीम इंडियासाठी बरेच सामने खेळलेले नाहीत आणि पुढेही त्याची निवड होणे खूप कठीण आहे. टीम इंडियाकडून पहिल्यांदा खेळताना सिराजचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे.