टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सनी मात

पांड्याने या मालिकेत दुसर्यांदा अर्धशतक केले.  

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 24, 2017, 10:59 PM IST
टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सनी मात title=

इंदौर: इंदौरच्या होळकर स्टेडिअममध्ये तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ५ विकेटने मात केली आहे. भारताकडून मनिष पांडेने ३६ धावा, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( ३ ) धावांवर नाबाद राहिले. त्याआधी अष्टपैलू हार्दिक पांड्याने ७८ धावांची तूफान खेळी केली.पांड्याने या मालिकेत दुसर्यांदा अर्धशतक केले. आणि मॅन ऑफ द मॅच ठरला आहे.

सलामी फलंदाज रोहित शर्माने ७१ धावा तर अजिंक्य रहाणेने ७० धावा करत चांगली सुरूवात करुन दिली. भारतीय कर्णधार विराट कोहली २८ धावांवर बाद झाला होता