दिल्ली कॅपिटल्समध्ये कसा झाला यशस्वी बदल, कैफने केला खुलासा

 आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करत आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याची खात्री आहे.

Updated: Oct 1, 2021, 07:23 PM IST
दिल्ली कॅपिटल्समध्ये कसा झाला यशस्वी बदल, कैफने केला खुलासा title=

नवी दिल्ली : आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करत आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याची खात्री आहे. गेल्या मोसमात, दिल्ली संघ अंतिम फेरीत पोहचला जिथे त्याला मुंबईकडून पराभवाला सामोरे जावे लागले आणि या संघाचे प्रथमच जेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, यावेळी दिल्ली ज्या पद्धतीने खेळत आहे, त्याला जेतेपदाचा दावेदार म्हणूनही मानले जात आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ म्हणाला की, आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या अनेक भारतीय खेळाडूंची उपस्थिती या इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी फायदेशीर ठरली आहे. त्यांनी आपल्या संघातील हुशार भारतीय खेळाडूंचे महत्त्व आणि उपयुक्तता यावर भर दिला.

कैफ म्हणाला, 'कोणत्याही फ्रँचायझीसाठी सर्वोत्तम भारतीय खेळाडू असणे महत्वाचे आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्याकडे काही महान भारतीय खेळाडू आहेत. जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात. आणि त्यांना त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या समजतात, हा कोणत्याही संघासाठी फायदा आहे. टीम इंडियाकडून खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, आर अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ सारखे खेळाडू आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात विजय नोंदवू इच्छित असणार. दिल्ली कॅपिटल्सने 11 पैकी आठ सामने जिंकले आहेत आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. कैफ म्हणाला की, 'आमचे लक्ष मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीवर असेल. आम्ही प्रथम फलंदाजी करतो किंवा लक्ष्याचा पाठलाग करतो, आम्हाला चांगली फलंदाजी करावी लागते. मुंबईचा संघ विलक्षण आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळण्यासाठी सर्व खेळाडू नेहमीच उत्सुक असतात.'