भारताला सुरुवातीलाच धक्के

दुसऱ्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Oct 10, 2017, 11:01 PM IST
भारताला सुरुवातीलाच धक्के title=

गुवाहाटी : दुसऱ्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियममध्ये या मॅचला सुरुवात झाली आहे. तीन टी-20 मॅचच्या सीरिजमधली पहिली मॅच भारतानं जिंकली आहे. त्यामुळे ही मॅच जिंकून टी-20 सीरिजही खिशात घालण्यासाठी विराट सेना मैदानात उतरली आहे. पहिल्या टी-20मध्ये खेळलेली भारतीय टीमच या मॅचमध्ये खेळण्यासाठी उतरली आहे.

या मॅचच्या सुरुवातीलाच भारताला तीन धक्के बसले आहेत. रोहित शर्मा ४ बॉल्समध्ये ८ रन्स बनवून आऊट झाला तर विराट कोहली २ बॉल्समध्ये शून्य रन्स करून माघारी परतला. मनिष पांडे ७ बॉल्समध्ये ६ रन्स करून आऊट झाला

भारतीय टीम : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, मनिष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझुवेंद्र चहाल, जसप्रीत बुमराह

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा