रोहित शर्माच्या शतकामुळे भारत विजयाजवळ

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं मारलेल्या शतकामुळे भारत विजयाच्या जवळ पोहोचला आहे.

Updated: Aug 27, 2017, 09:34 PM IST
रोहित शर्माच्या शतकामुळे भारत विजयाजवळ  title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं मारलेल्या शतकामुळे भारत विजयाच्या जवळ पोहोचला आहे. रोहित शर्माचं हे वनडे क्रिकेटमधलं १२वं शतक होतं. ११८ बॉलमध्ये केलेल्या या शतकामध्ये १४ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.

२१८ रन्सचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच धक्के बसले. १३८ रन्सवर भारताचे ४ बॅट्समन आऊट झाले होते, पण रोहित शर्मा आणि धोनीनं भारताची इनिंग सावरली. रोहित आणि धोनीच्या या इनिंगमुळे आता भारत विजयाच्या जवळ पोहोचला आहे. याआधीच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता, त्यामुळे आता ही मॅचही जिंकून सीरिज खिशात टाकण्याची संधी भारतापुढे आहे.

या मॅचमध्ये श्रीलंकेनं भारतापुढे विजयासाठी २१८ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेणाऱ्या श्रीलंकेला ५० ओव्हरमध्ये ९ विकेट्सच्या मोबदल्यात २१७ रन्स बनवता आल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पांड्या, अक्सर पटेल आणि केदार जाधवला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा