'तुला पुरुषात कोणते गुण हवेत?', KBC मध्ये प्रश्न ऐकताच स्मृती मंधानाच्या भुवया उंचावल्या; 'असे प्रश्न...'

भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज स्मृती मंधाना नुकतीच 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला चाहत्याने तुला नेमका कसा मुलगा आवडेल? असा प्रश्न विचारला.   

शिवराज यादव | Updated: Dec 27, 2023, 01:15 PM IST
'तुला पुरुषात कोणते गुण हवेत?', KBC मध्ये प्रश्न ऐकताच स्मृती मंधानाच्या भुवया उंचावल्या; 'असे प्रश्न...'

स्मृती मंधाना भारतीय महिला क्रिकेट संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. स्टार खेळाडूंमध्ये तिची गणना केली जाते. स्मृतीने आतापर्यंत 6 कसोटी, 80 एकदिवसीय आणि 125 टी-20 सामने खेळले आहेत. तिन्ही प्रकारात तिने आतापर्यंत 6000 धावा केल्या आहेत. नुकतीच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत तिने 74 आणि नाबाद 38 धावा ठोकल्या. भारताने यावेळी कसोटीतील पहिल्या विजयाची नोंद केली. दरम्यान नुकतंच स्मृतीने 'कौन बनेगा करोडपती'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडी इशान किशनही होता. यादरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासह उपस्थित प्रेक्षकांनी स्मृतीला अनेक प्रश्न विचारले. 

Add Zee News as a Preferred Source

एका चाहत्याने यावेळी स्मृतीला विचारलं की, "तुमचे इंस्ट्राग्रामला इतके पुरुष फॉलोअर्स आहेत. तुम्हाला एका मुलामधे नेमके कोणते गुण हवे आहेत?". हा प्रश्न ऐकताच इशान किशनसह सर्वजण हसू लागतात. एकदम प्रश्न वळवला अशी कमेंटही इशान करतो. दरम्यान अमिताभ बच्चन चाहत्याला 'तुझं लग्न झालं आहे का?' अशी विचारणा करतात. त्यावर चाहता म्हणतो 'नाही सर. त्यामुळेच तर मी विचारत आहे'.

दरम्यान स्मृती प्रश्नाचं उत्तर देताना सांगते की, "मी अशा प्रश्नाची अपेक्षा केली नव्हती. चांगला मुलगा असावा हेच जास्त महत्त्वाचं आहे. तो काळजी घेणारा आणि माझा खेळ समजून घेणारा असावा. हे दोन महत्त्वाचे गुण त्याच्याकडे असले पाहिजेत. कारण एक मुलगी म्हणून मी त्याला जास्त वेळ देऊ शकणार नाही. त्याने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि त्याची काळजीही घेतली पाहिजे. याच प्राथमिकता आहेत. हेच गुण मी मुलात पाहत आहे".

दरम्यान बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेसाठी महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौर एकदिवसीय आणि टी-20 संघाचं नेतृत्व करेल, तर स्मृती  उपकर्णधार असेल. संघाला इंग्लंडविरुद्ध T20I मालिकेत 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामने जिंकत त्यांनी इतिहास रचला. 

ऑस्ट्रेलियात संघ प्रथम तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. सर्व सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवले जातील. तर तीन टी-20 सामने नवी मुंबईत होणार आहेत. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More