आर आर पाटील

गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड

सांगली जिल्ह्यात म्हणजे गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा तालुक्यातील तीन एकर जमिनीवर अफूची लागवड केली जात असल्याचं उघड झाले आहे. तर कोल्हापुरातही अफुची लागवड करण्यात आल्याचं पुढे आले आहे.

Feb 28, 2012, 06:27 PM IST

टीका करताना दमानं, पवारांचा सबुरीचा सल्ला!

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे विरुद्ध अजित पवार आणि आर. आर. पाटील या जुगलबंदीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सभांमधून बोलताना संयम पाळावा तसंच वैयक्तिक टीका करु नये, असा सल्ला शरद पवारांनी आर. आर. पाटील आणि अजित पवारांना दिला आहे.

Feb 3, 2012, 11:13 PM IST

राणेंचे वस्त्रहरण आणि घडामोडी...

नारायण राणे यांच्या कुडाळच्या वस्त्रहरण सभेनंतर राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये महाभारत रंगलंय. राणेंनी अजित पवार आणि गृहमंत्र्यांना टार्गेट केल्यानंतर, आता राष्ट्रवादीकडून पलटवार होऊ लागले आहेत. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक आरोप प्रत्यारोप हो लागल्यानं, ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.

Feb 2, 2012, 08:45 AM IST

वस्त्र द्या, वस्त्रहरणाची भाषा नको - आबा

द्योगमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचं वस्त्रहरण करणार अशी घोषणा करताच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीदेखील नारायण राणे यांना उत्तर देत त्यांच्या वस्त्रहरणबाबत चांगलीच खिल्ली उडवली आहे. इतरांना वस्त्र देण्याऐवजी उद्योगमंत्री नारायण राणे वस्त्रहरणाची भाषा का करतात.

Jan 29, 2012, 07:32 PM IST

गडचिरोलीत जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम

गेल्या पाच वर्षातल्या कामामुळे तसंच केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसचं सरकार असल्यामुळं यावेळीही गडचिरोली झेडपीत काँग्रेसची सत्ता येईल असा त्यांच्या नेत्यांना विश्वास वाटत आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गृहमंत्री आर आर पाटील यांनी घेतली आहे.

Jan 27, 2012, 10:30 PM IST

आनंदराज आंबेडकरांनी इंदू मिलचा ताबा सोडला

इंदू मिल जागेच्या वादाबाबत सरकारनं मध्यस्थी केल्यानंतर या जमिनीवरचा ताबा काही दिवसांसाठी सोडणार असल्याचं आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं आहे.

Dec 29, 2011, 08:56 PM IST

आबांनी केलं सेना, मनसेला लक्ष्य

उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सेनेवर टीका केली आहे. परप्रांतीयांना मुंबईतून हाकलण्यामध्ये खऱ्या अर्थानं मनसेपेक्षा शिवसेनेलाच अधिक श्रेय जातं असा टोला त्यांनी लगावला.

Dec 5, 2011, 03:04 AM IST

'समुद्रातील' मुंबई 'खड्ड्यात' घातली- आबा

राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील शीतयुद्ध चांगलंच रंगत चाललं आहे. आधी पवार आणि ठाकरे वाद यामुळे वादाला सुरवात होताच प्रत्येकांने यात उडी मारली.

Dec 4, 2011, 06:31 AM IST