सत्यमेव जयते

मैला सफाईबाबत नवं विधेयक - आमिर

आमिर खानने सत्यमेव जयते कार्यक्रमातून वाचा फोडलेल्या प्रश्नाबाबत पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाणार आहे. तशी माहिती सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांनी दिली. पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमिरला वासनिक यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला होता.

Jul 16, 2012, 04:55 PM IST

आमिर खान पंतप्रधानांच्या भेटीला

प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहे. आमिर यावेळी डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्यांच्या समस्येवर चर्चा करणार आहे. आरोग्याचा हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी आमिरची मागणी आहे.

Jul 16, 2012, 10:09 AM IST

आमिर खान भावी पंतप्रधान - शक्ती कपूर

शक्ती कपूरची स्वतःची प्रतिमा जनमानसात कशीही असली आणि त्याचं वागणं कितीही वादग्रस्त असलं, तरी शक्ती कपूरने आपल्याला देशाची काळजी असल्याचं दाखवायला सुरूवात केली आहे.

Jul 12, 2012, 01:59 PM IST

'थोडी सी शराब'... आमीर सापडला वादात

आमीर खान प्रोडक्शननिर्मित सत्यमेव जयते हा पुन्हा एकदा वादात सापडलाय. ‘ज्यांना दारु प्यायची असेल त्यांनी थोडी थोडी प्या’ हे आमीरचं वक्तव्यं आता चर्चेचा विषय ठरलंय.

Jul 12, 2012, 11:30 AM IST

जावेद अख्तर होते पक्के दारुडे

मी १९ व्या वर्षापासूनच म्हणजे मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासून दारु प्यायला लागलो होतो. हळू -हळू ही सवय इतकी होत गेली की मी रोज एक बाटलीची दारु संपवू लागलो होतो, असे स्वतः बॉलीवूडमधील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कबुली दिली. तब्बल २६-२७ वर्षापर्यंत पक्का दारुडा होतो, असेही त्यांनी आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात मान्य केले.

Jul 1, 2012, 06:57 PM IST

आमीर म्हणतो, 'टीआरपी'ची चिंता कोणाला?

काही लोक आमीर खानच्या टीव्ही शो 'सत्यमेव जयते' याबाबत नाराज आहे. हा शो यावर्षी सहा मे पासून झाला. आमीर खानच्या भन्नाट विचारसरणीवर बेतलेल्या या शोसाठी अनेकजण टीव्हीकडे डोळे लावून बसलेले असतात.

Jun 27, 2012, 06:08 PM IST

स्त्रीभ्रूण हत्या: आमिर जाणार राज्यसभेत

आमिर खान प्रोडक्शननिर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खाननं स्त्री भ्रूण हत्येच्या गंभीर विषय मोठ्या सामंजस्यानं हाताळला होता. हाच विषय राज्यसभेत मांडण्यासाठी आमिरला आमंत्रण देण्यात आलंय आणि आमिरनं ते स्विकारलंही आहे.

Jun 20, 2012, 03:02 PM IST

'सलमान'ला आमीरचा 'अभिमान', काय म्हणतो 'खान'

अभिनेता सलमान आणि आमिर खान यांचं नातं इतकं चागलं नाहीये. आजवर त्या दोघांनी फक्त एकच सिनेमामध्ये काम केलं आहे. दोघं एकमेकांबाबत बोलण्यासही का - कू करीत असतात.

Jun 19, 2012, 01:33 PM IST

सलमान आमिरला म्हणाला 'टिलू'

बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि आमिर खानची मैत्री म्हणजे ‘जय-वीरू’च्या मैत्रीसारखी प्रसिद्ध आहे. खरंतर सलमान खान आणि आमिर खानने फक्त एकाच सिनेमात एकत्र काम केलं आहे. मात्र, तेव्हापासून निर्माण झेली मैत्री आजही तितकीच घनिष्ट आहे.

Jun 17, 2012, 05:43 PM IST

आमिरमुळे चिमुरडी पळून लग्न करणार!

बॉलिवुड स्टार आमिर खानचा शो सत्यमेव जयते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे आमिर खान रोज एका नव्या अडचणीत सापडत आहे. सुरूवातीला डॉक्टरांनी आमिरला माफी मागण्यास सांगितले होते. आता हरिणाची खाप पंचायत त्याच्यामागे पडली आहे.

Jun 13, 2012, 06:18 PM IST

खाप पंचायतीची ‘पंचाईत’?

दोन आठवड्यांपूर्वी डॉक्टरांच्या काळ्या बाजूचं दर्शन घडवून आमिरला डॉक्टरांचा रोष आमिरनं ओढावून घेतला होता. तर मागच्या आठवड्यात खाप पंचायतीलाच ‘पंचायती’समोर बसवून आमिर पुन्हा रोषाचा धनी झालाय.

Jun 9, 2012, 05:57 PM IST

डॉक्टरांची माफी मागणार नाही – आमिर खान

सत्यमेव जयते या कार्यक्रमातून जनजागृती करणारा बॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानने डॉक्टरांची माफी मागण्यास इन्कार केला आहे. शोमधून डॉक्टरांची तसेच त्याच्या पेशाची बदनामी केली असल्याचा आरोप करत डॉक्टरांनी आमिरकडे माफीची मागणी केली होती.

Jun 7, 2012, 06:40 PM IST

खटला दाखल केला तरी पर्वा नाही- आमिर

सत्यमेव जयते या कार्यक्रमातून जनजागृती करणारा बॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानने डॉक्टरांची माफी मागण्यास इन्कार दिला आहे. त्यामुळे आता भारतीय वैद्यकीय संस्थेने माझ्याविरोधात खटला दाखल केला, तर त्यास मी तयार असल्याचे आमीरने म्हटले आहे.

Jun 7, 2012, 06:39 PM IST

आमिर खान करणार विनामोबदला जनजागृती

टीव्ही पडद्यावर आपल्या सत्यमेव जयते या शोद्वारे सामाजिक मुद्द्यांना ऐरणीवर आणणारा अभिनेता आमिर खान आता लवकरच एका प्रचार अभियानाद्वारे कुपोषणच्या समस्येवर जनतेला जागरुक करायला निघणार आहे.

Jun 6, 2012, 07:42 AM IST

आमिरच्या औषधांनी डॉक्टरांचं तोंड कडू

'सत्यमेव जयते'द्वारे आमिर खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याचं केवळ अभिनयापुरतंच मर्यादित न राहाता सामान्य जनतेचे प्रश्न कळकळीने मांडणं लोकांना पसंत पडल्याचं दिसत आहे. मात्र, काही लोक मात्र आमिरच्या या कार्यक्रमाबद्दल नाराज झाले आहेत.

May 31, 2012, 11:50 PM IST