convert in violent

शेतकरी संपाला औरंगाबादमध्ये हिंसक वळण

शेतकरी संपाला आज सकाळी औरंगाबादमध्ये हिंसक वळण लागलं. औरंगाबादच्या जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली शंभराहून अधिक शेतकरी बाजार बंद करण्याचे आवाहन करीत होते. त्याच दरम्यान एका ट्रकची हवा सोडत असताना व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यावर हल्ला केला. यात जयाजीराव सूर्यवंशीसह ५ शेतकऱ्यांना मारहाण केली.

Jun 1, 2017, 04:55 PM IST