election 2017

विधानसभा निवडणुकीत इतक्या टक्के लोकांनी दाबलं 'नोटा'चं बटन

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन्ही जागी भाजपने बहुमत मिळवलं आहे.

Dec 19, 2017, 11:46 AM IST

'शिष्य' पडला 'गुरु'वर भारी, राजेंद्र राणांकडून धुमल यांचा पराभव!

भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांना पराभवाचा धक्का बसलाय. महत्त्वाचं म्हणजे, धुमल यांचे 'राजकीय शिष्य' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र राणा यांनी त्यांचा पराभव केलाय. 

Dec 18, 2017, 08:07 PM IST

गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी भाजप यांच्या नावाची करणार घोषणा

गुजरातमध्ये भाजप हिमाचल प्रदेश प्रमाणेच जातीच्या आधारे मुख्यमंत्रीपदासाठी नाव घोषित करु शकतात.

Nov 30, 2017, 06:32 PM IST

राहुल गांधी ३ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीची तारीख जशी-जशी जवळ येत आहे तसं राज्यातील राजकीय घडामोडी अधिक वेगाने वाढत आहे. सर्व पक्षाचे प्रमुख नेते राज्यातील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी कामाला लागले आहेत. यातच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष भरूच येथून हा दौरा सुरू करणार आहेत. या काळात राहुल गांधी दक्षिण गुजरातमधील भरूच, तापी, वलसाड, नवसारी आणि सुरतमध्ये जातील. या वेळेत ते सभा आणि रॅली करतील. राहुल गाँधी शेतक-यांच्याशी देखील चर्चा देखील करणार आहेत.

Nov 1, 2017, 09:45 AM IST

गुजरातमध्ये पुन्हा येणार भाजपचीच सत्ता?

गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. तसेच अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन कामाचे भूमीपूजनही केलं आहे. 

Oct 25, 2017, 11:07 AM IST

चंद्रपूर, गडचिरोलीत मतदान सुरू

निवडणुकीच्या या कामात जवळपास ७०० महसूल विभागाचे आणि ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. 

Oct 16, 2017, 01:38 PM IST

सांगली जिल्ह्यात सकाळच्या सत्रात ३६ टक्के मतदान

  सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायती निवडणूकीत सकाळी साडे अकरापर्यंत 36 टक्के मतदान झाले आहे.  या  निवडणुकीत भाजपा खासदार संजय काका पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तर माजी मंत्री जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

Oct 16, 2017, 01:20 PM IST

आगामी निवडणुकांसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन

दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. प्रथमच पक्षाचे खासदार आणि आमदारही या बैठकीत सहभागी झाले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत पुढील पाच महिने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठीचा अॅक्शन प्लॅन ठरवला जाणार आहे.

Sep 25, 2017, 02:49 PM IST

राज्यातील ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ११४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.

Aug 22, 2017, 06:11 PM IST

भिवंडी मनपा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा

सुरुवातीला काँग्रेसला जबरदस्त टक्कर देणारा भाजप आता भिवंडीत मागे पडू लागला आहे. ताज्या आकडेवारीनुसार २२ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला आहे २० उमेदवार आघाडीवर आहे. तर भाजपते ९ उमेदवार विजयी झाले असून ७ उमेदवार आघाडीवर आहेत.

May 26, 2017, 02:17 PM IST

परभणी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सरशी

परभणी महापालिकेच्या निवडणूक निकालात काँग्रेसची सरशी झाल्याचं पाहायला मिळतंय. निवडणूक निकालात 31 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 10 ठिकाणी आघाडीवर आहे. शिवसेना आणि भाजपनं प्रत्येकी सात जागांवर आघाडी घेतली आहे. परभणीत एकूण 65 जागांसाठी मतदान झालं होतं.

Apr 21, 2017, 02:33 PM IST

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. उत्तरप्रदेश निवडणुकीत मिळालेल्या नेत्रदीपक विजयाबद्दल राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

Mar 16, 2017, 02:26 PM IST

राजधानी दिल्लीत भाजपची 'लिटमस टेस्ट'!

राजधानी दिल्लीत भाजपची 'लिटमस टेस्ट'!

Mar 14, 2017, 11:52 PM IST

राजधानी दिल्लीत भाजपची 'लिटमस टेस्ट'!

उत्तर प्रदेशात भाजपाच्या दिग्विजयानंतर लगेचच राजधानी दिल्लीमध्ये पक्षाची लिटमस टेस्ट होणार आहे.

Mar 14, 2017, 11:26 PM IST

राहुल गांधींचं नेतृत्व मतदारांनी पुन्हा नाकारलं

देशात नुकताच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्ण यश मिळालं. ३ राज्यांमध्ये भाजप सरकार बनवणार आहे. मोदी-शहा यांच्या पुढे सगळेच नेते फ्लॉप ठरले. काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव झाला. राहुल गांधी यांचं नेतृत्व पुन्हा एकदा अपयशी ठरलं. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेला आणखी बळ मिळालं. 

Mar 11, 2017, 05:46 PM IST