elections

मी मोदींना घाबरलो नाही- राहुल गांधी

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की , मी भाजपच्या कोणत्याच नेत्याला भीत नाही. काँग्रेसच्यावतीनं पंतप्रधानपदाचे उमेदवार न होऊन ते मोदींना टक्कर देण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हा प्रश्न समजायला तुम्हाला आधी राहुल गांधी कोण आहे हे समजावं लागेल. मग तुम्हाला कळेल मी कोणालाच भीत नाही, असंही ते म्हणाले.

Jan 28, 2014, 11:11 AM IST

.. मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर!

दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपचा `झाडू`च कारणीभूत ठरला... आम आदमीच्या या घवघवीत यशाचा सूत्रधार होता एक आयआयटीचा मॅकेनिकल इंजिनिअर... अरविंद केजरीवाल...

Dec 8, 2013, 10:40 PM IST

मध्य प्रदेशात पुन्हा भाजपला कौल, विजयाची हॅटट्रिक!

मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपने आपला करीष्मा दिसून आलाय. मतदारांनी भाजपलाच कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजयाची हॅटट्रिक भाजप साधणार असेच दिसतेय. १३४ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची बहुमताकडे सध्यातरी वाटचाल दिसून येत आहे.

Dec 8, 2013, 10:52 AM IST

तुरुंगातून निवडणूक लढविण्‍यास न्‍यायालयाची मंजुरी

तुरुंगात असलेल्‍या नेत्‍यांना सर्वोच्‍च न्‍यायालयाने एक दिलासा दिला आहे. तुरुंगातून निवडणूक लढविण्‍यास न्‍यायालयाने मंजुरी दिली आहे. लोकसभेत संमत करण्‍यात आलेल्‍या दुरुस्‍ती विधेयकाला न्‍यायालयाने मंजुरी दिली आहे.

Nov 20, 2013, 07:24 AM IST

काँग्रेसकडून शिवसेना टार्गेट, मनसेला झुकते माप?

काँग्रेस विरूद्ध नरेंद्र मोदी असे राजकीय रंग भरले असतानाच आता काँग्रेसने शिवसेनेला टार्गेट करण्याचं धोरण अबलंबिले दिसून येत आहे. शिवसेना टार्गेट करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे.

Nov 19, 2013, 01:29 PM IST

ठाणे पालिकेत महायुतीचे विलास कांबळे बिनविरोध

ठाणे महापालिका स्थायी समिती निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. महायुतीचे विलास कांबळे बिनविरोध स्थायी समितीवर निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धूळ चारली.

Oct 11, 2013, 01:56 PM IST

ठाणे पालिकेत रंगत, राष्ट्रवादीच्या साळवींचा राजीनामा

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश साळवी यांनी राजीनामा दिला. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान भाजपचे संजय वाघुलेही अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या खेळीमुळे आघाडीपुढे पेच निर्माण झाल्याचं मानलं जातंय.

Oct 11, 2013, 09:41 AM IST

मोदींच्या सभेसाठी १० हजार बुरख्यांची खरेदी - दिग्गीराजा

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेसाठी १० हजार बुरखे खरेदी केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

Sep 24, 2013, 07:47 PM IST

पाकिस्तानात मतदान पूर्ण, हिंसाचारात २४ ठार

दहशतवादी धमक्यांमध्ये आणि कारवायांमध्ये पाकिस्तानात शनिवारी मतदान पार पडलं. मतदान संपन्न झाल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झालीय.

May 11, 2013, 09:28 PM IST

पवारांनी लोकसभा निवडणुकीचे वाजवले बिगुल

लोकसभेत दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर सरकराचं भवितव्य अवलंबून आहे. केंद्रातील सरकार कधी पडेल, याचा भरवसा नाही, असे संकेत देताना आगामी काळात निवडणुकीसाठी सज्ज राहा, असा संदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

Apr 27, 2013, 03:44 PM IST

नारायण राणेंना दे धक्का, काँग्रेसचा उमेदवार बाद

काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांना कणकवलीत जोरदार धक्का बसला आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाद ठरले आहेत.

Mar 8, 2013, 07:27 PM IST

नगरपालिकांवर काँग्रेसचाच झेंडा

राज्यात काल झालेल्या 10 नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलंय. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारलीय. शिवसेना, मनसे आणि भाजपचा या निवडणुकीत धुव्वा उडालाय. नंदूरबार, नवापूर, तळोदा आणि यवतमाळ जिलह्यातली पांढरकवडा या 4 नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकलाय.

Nov 5, 2012, 10:42 PM IST

दिल्लीत भाजपचा काँग्रेसला हादरा

नवी‍ दिल्‍लीची सत्ता पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यात भाजपला यश येण्याची शक्यता आहे. भाजपने चारही महानगरनिगममध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना मोठा धक्का आहे. भाजपने काँग्रेसला जोरदार टक्कर दिल्याचे निकालावरून दिसून येत आहे.

Apr 17, 2012, 05:48 PM IST

राज्यात कमी मतदान, सत्ताधाऱ्यांना दिलासा?

राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी शांततेत मतदान झालं. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत दिवसाच्या शेवटी ४५ टक्क्यांच्या आतच मतदान झाल्याची शक्यता आहे. गेल्यावेळी ४६ टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदारांनी फारसा उत्साह दाखवला नाही.

Feb 16, 2012, 07:55 PM IST

राष्ट्रवादीची नवी भूमिका गुंडगिरी नको

गुंडगुरी करणारे लोक राजकारणात नको ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. ज्या पक्षात असे लोक असतील त्यांचा जनतेनं खुशाल पराभव करावा असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी केलयं.

Dec 8, 2011, 06:47 AM IST