india won warm up match

T20 WC: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा विजय, शमीची भेदक गोलंदाजी

टी 20 वर्ल्डकपपूर्वीच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.

Oct 17, 2022, 01:03 PM IST