कोरोनाबाबत शास्त्रज्ञांचा इशारा, तर २ वर्ष लॉकडाऊन लागू करावे लागेल

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरु आहेत.

Updated: Apr 15, 2020, 05:03 PM IST
कोरोनाबाबत शास्त्रज्ञांचा इशारा, तर २ वर्ष लॉकडाऊन लागू करावे लागेल title=

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढती गती पाहता, जगातील सर्व देशांना नाईलाजाने लॉकडाउन करावे लागले. भारतातील 21 दिवसांचा लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा 3 मेपर्यंत तो वाढविण्यात आला. याद्वारे, सामाजिक अंतराचे नियम आणखी कठोर केले गेले आहेत. अनेक देशांना अशी आशा आहे की लॉकडाऊन आणि सामाजिक अंतरामुळे ते काही महिन्यांतच या अडचणीतून मुक्त होतील.

तथापि, वैज्ञानिकांनी असा इशारा दिला आहे की कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 2022 पर्यंत सामाजिक अंतरावर जाण्याची गरज भासू शकते. नवीन अभ्यासात, संशोधकांनी असे म्हटले आहे की येत्या काही वर्षांत पुन्हा कोरोनाचा प्रसार होऊ शकतो.

सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, फक्त एकदाच लॉकडाउन करून साथीवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. प्रतिबंधात्मक उपायांशिवाय कोरोना विषाणूची दुसरी लाट अधिक भयानक असू शकते.

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे एपिडेमिओलॉजिस्ट आणि लेखक मार्क लिपिसच म्हणाले की, दोन गोष्टी झाल्या की संसर्ग पसरतो - एक संक्रमित व्यक्ती आणि दुसरी कमकुवत रोगप्रतिकारशक्ती. जगातील बहुतेक लोकसंख्येमध्ये विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित होईपर्यंत मोठी लोकसंख्या असुरक्षित होण्याची शक्यता आहे.

जर 2025 पर्यंत यावर लस शोधली नाहीतर कोरोना विषाणू पुन्हा संपूर्ण जगात पसरेल. एपिडेमिओलॉजिस्ट मार्क म्हणतात की, कोरोना विषाणूच्या संसर्गाची सद्यस्थिती पाहता, २०२० च्या उन्हाळ्यापर्यंत साथीच्या रोगाचा अंत कसा होईल हे सांगणे योग्य नाही.

यूके सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार समितीने असे सूचित केले की, रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखणे आवश्यक आहे. समितीने असे म्हटले आहे की, सरकारने काही वर्ष कधी सक्ती तर कधी थोडासा दिलासा देऊन सोशल डिस्टंसिंग सुरु ठेवले पाहिजे. 

संशोधनानुसार नवीन उपचार, लस आणि सुधारित आरोग्य सुविधांच्या बाबतीत शारीरिक अंतर आता यापुढे अनिवार्य होणार नाही, पण यावर लस आणि योग्य उपचाराची माहिती मिळेपर्यंत 2022 पर्यंत शारीरिक अंतर ठेवणं लागू करावे लागू शकते.

संशोधकांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाबद्दल अनेक रहस्यांचे निराकरण झाले नाही, म्हणून बराच काळ अचूकपणे सांगणे कठीण आहे. जर लोकांची प्रतिकारशक्ती कायमस्वरूपी झाली तर कोरोना विषाणू पाच वर्ष किंवा त्याहून अधिक काळ अदृश्य होईल. जर लोकांची प्रतिकारशक्ती केवळ एका वर्षासाठी कायम राहिली तर इतर कोरोना विषाणूंप्रमाणे ही रोगराई देखील दरवर्षी परत येऊ शकते.

इतर बातमी : थंड देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी, संशोधनानुसार भारताला थोडा दिलासा

संशोधक लिपिश्च म्हणाले, सुमारे एक वर्षासाठी जगाला अंशीक सुरक्षा मिळण्याची दाट शक्यता आहे. व्हायरसपासून संपूर्ण संरक्षण मिळविण्यात कित्येक वर्षे लागू शकतात. या क्षणी, आम्ही फक्त अनुमान काढू शकतो. सर्व परिस्थितीत हे निश्चित आहे की कोरोना दूर करण्यासाठी वन-टाइम लॉकडाउन पुरेसे ठरणार नाही. एकदा निर्बंध काढून टाकल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग पसरतो.

जगभरातील शास्त्रज्ञ म्हणतात की, लस तयार होत नाही तोपर्यंत कोरोना विषाणूपासून पूर्णपणे मुक्त होणे कठीण आहे. अमेरिकेच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अँथनी फौची यांनीही म्हटले आहे की कोरोना विषाणूचे मूळपासून नष्ट करणे जगाला इतके सोपे होणार नाही.

जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष राजदूत डेव्हिड नाबारो यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणू दीर्घ काळासाठी मानवजातीचा पाठलाग करत राहील. जोपर्यंत लोक लसपासून स्वत: चे संरक्षण करण्यास सक्षम नाहीत तोपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच राहील.

सेल्युलर मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक डॉ. सिमन क्लार्क यांनी इंडिपेन्डंटशी संवाद साधताना सांगितले की, कोरोना विषाणूच्या समाप्तीची तारीख देणे अशक्य आहे. जर कोणी तुम्हाला कोरोना विषाणूच्या समाप्तीची तारीख सांगत असेल तर याचा अर्थ असा आहे की ते क्रिस्टल बॉल पाहून भविष्यवाणी करत आहेत. सत्य हे आहे की कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे आणि आता तो आपल्याबरोबर कायमचा राहणार आहे.

हे पण वाचा: धोक्याची घंटा, देशात कोरोनामुळे मृत्यू झालेला प्रत्येक दुसरा व्यक्ती महाराष्ट्राचा