दोन महिन्यांनंतर घरी परतलेल्या अभिषेकसाठी आराध्याचा गोड मेसेज...

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सिनेमाच्या शूटिंगसाठी काश्मीरला गेला होता. 

Updated: Apr 26, 2018, 02:42 PM IST
दोन महिन्यांनंतर घरी परतलेल्या अभिषेकसाठी आराध्याचा गोड मेसेज... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सिनेमाच्या शूटिंगसाठी काश्मीरला गेला होता. सुमारे दोन महिन्यांनी घरी परतल्यानंतर पहिल्यांदा तो ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याला लॅपटॉपजवळ एक नोट सापडली. ज्यावर आय लव्ह यू पापा असे लिहिले होते. ही नोट पाहून अभिषेक काहीसा भावूक झाला. हा गोड मेसेज खुद्द आराध्याने लिहिला होता. यावरून तिचे वडीलांवरील प्रेम प्रतीत होतेच. पण दोन महिन्यात तिने वडीलांना किती मिस केले हे ही जाणवते. अभिषेक सध्या अनुराग कश्यपच्या मनमर्जियां सिनेमात व्यस्त आहे. हा सिनेमात पंजाबची एक प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात अभिषेक पंजाबी सरदारची भूमिका साकारणार आहे.

पहा आराध्याचा मेसेज...

 

When you get back to office after over 2 months and the daughter has left you a note. #mydaughterbestest

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

 

ट्रोलिंगला अभिषेकने दिले सडतोड उत्तर

अलिकडेच अभिषेकला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्याचे त्याने सडेतोड उत्तर दिले. ट्रोल करतनान युजरने लिहिले की, तुमच्या आयुष्याबद्दल वाईट विचार करु नका. अभिषेक बच्चन अजूनही त्याच्या आई वडिलांबरोबरच राहतो. यावर उत्तर देताना अभिषेकने लिहिले की, हो, आणि ही माझ्यासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट आहे. मी आजही त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेस उभा असेन, जसे ते माझ्यासाठी आहेत. अभिषेक बच्चन त्याच्या आई वडिलांबरोबर पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत जलसातच राहतो.
असे पहिल्यांदाच होत नाहीये. यापूर्वीही अभिषेकने ट्रोलर्संना जबरदस्त उत्तरे दिली आहेत. आपल्या मुलीबद्दल, पत्नीबद्दल विचित्र कमेंट करणाऱ्यांना अभिषेकने आपल्या उत्तरातून त्यांची जागा दाखवून दिली आहे.